शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:10 IST

मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.

ठळक मुद्देशासकीय जनजागृतीचा होतोय परिणाम : मुलीचा जन्मदर हळूहळू वाढतोय

राजकुमार चुनाारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.चंद्रपूर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींचा दर ९३६ इतका वाढला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २०१३ मध्ये ९५४ होते. त्याच्यानंतर २०१४ पासून ते आजपर्यंत मुलींचा जन्मदर सरासरी ९५४ ते ९६७ पर्यंत गेल्यामुळे जिल्ह्यात मुलींचे म्हणजेच सावित्रीच्या लेकींचे स्वागत होत आहे.तसे पाहिले तर एक हजार मुलांमागे ९५० इतक्या मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या व वैद्यकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात मुलगा हवा आहे, या हट्टापोटी अनेक स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली होती. २००१ ते २०११ पर्यंत मुलींचे प्रमाण सर्वसामान्य इतके होते. परंतु २०१३ व २०१४ यावर्षी मुलींचे प्रमाण ९५४ ते ९६७ इतके होते. मात्र, सध्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलींचे महत्त्व वाटू लागले आहे. तसेच समूपदेशन केले जात आहे. शासनाने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.सध्या केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी रूग्णालयात मुलींच्या जन्मासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. मुलींची घटती संख्या ही एक भयंकर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. याची जाणीव नवीन पिढीला झाली आहे. त्यामुळे नवीन पिढीमध्ये मुलगा, मुलगी असा भेद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.असा वाढत गेला मुलींचा जन्मदरविशेष म्हणजे, जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे रोखण्यामध्ये यश आले नसले तरी शासनाच्या पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्यामुळे मुलींचा जन्मदराचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात चिमूर तालुक्यात एक हजार मुलामागे सर्वाधिक मुलींचे प्रमाण ९८६ इतके आहे मागील पाच वर्षांपासून मुलीचा जन्मदर सरासरी ९३४ ते ९६७ पर्यंत गेला आहे. २०१३ ते २०१८ पर्यंतचा मुलींचा जन्मदर असा आहे. २०१३ मध्ये ८५४, २०१४ मध्ये ९६७, २०१५ मध्ये ८७७, २०१६ मध्ये ८९०, २०१७ मध्ये ९३४ व २०१८ मध्ये ९८६ इतका जन्मदर एक हजार मुलांमागे आहे.