शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:10 IST

मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.

ठळक मुद्देशासकीय जनजागृतीचा होतोय परिणाम : मुलीचा जन्मदर हळूहळू वाढतोय

राजकुमार चुनाारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.चंद्रपूर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींचा दर ९३६ इतका वाढला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २०१३ मध्ये ९५४ होते. त्याच्यानंतर २०१४ पासून ते आजपर्यंत मुलींचा जन्मदर सरासरी ९५४ ते ९६७ पर्यंत गेल्यामुळे जिल्ह्यात मुलींचे म्हणजेच सावित्रीच्या लेकींचे स्वागत होत आहे.तसे पाहिले तर एक हजार मुलांमागे ९५० इतक्या मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या व वैद्यकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात मुलगा हवा आहे, या हट्टापोटी अनेक स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली होती. २००१ ते २०११ पर्यंत मुलींचे प्रमाण सर्वसामान्य इतके होते. परंतु २०१३ व २०१४ यावर्षी मुलींचे प्रमाण ९५४ ते ९६७ इतके होते. मात्र, सध्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलींचे महत्त्व वाटू लागले आहे. तसेच समूपदेशन केले जात आहे. शासनाने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.सध्या केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी रूग्णालयात मुलींच्या जन्मासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. मुलींची घटती संख्या ही एक भयंकर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. याची जाणीव नवीन पिढीला झाली आहे. त्यामुळे नवीन पिढीमध्ये मुलगा, मुलगी असा भेद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.असा वाढत गेला मुलींचा जन्मदरविशेष म्हणजे, जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे रोखण्यामध्ये यश आले नसले तरी शासनाच्या पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्यामुळे मुलींचा जन्मदराचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात चिमूर तालुक्यात एक हजार मुलामागे सर्वाधिक मुलींचे प्रमाण ९८६ इतके आहे मागील पाच वर्षांपासून मुलीचा जन्मदर सरासरी ९३४ ते ९६७ पर्यंत गेला आहे. २०१३ ते २०१८ पर्यंतचा मुलींचा जन्मदर असा आहे. २०१३ मध्ये ८५४, २०१४ मध्ये ९६७, २०१५ मध्ये ८७७, २०१६ मध्ये ८९०, २०१७ मध्ये ९३४ व २०१८ मध्ये ९८६ इतका जन्मदर एक हजार मुलांमागे आहे.