शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यात हजार मुलांमागे ९६५ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:10 IST

मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.

ठळक मुद्देशासकीय जनजागृतीचा होतोय परिणाम : मुलीचा जन्मदर हळूहळू वाढतोय

राजकुमार चुनाारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात मागील पाच वर्षांपासून वाढ झाली असून एक हजार मुलांच्या मागे ९३६ इतक्या मुलींचे प्रमाण आहे.चंद्रपूर जिल्ह्यात प्रति एक हजार मुलांमागे मुलींचा दर ९३६ इतका वाढला आहे. एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण सन २०१३ मध्ये ९५४ होते. त्याच्यानंतर २०१४ पासून ते आजपर्यंत मुलींचा जन्मदर सरासरी ९५४ ते ९६७ पर्यंत गेल्यामुळे जिल्ह्यात मुलींचे म्हणजेच सावित्रीच्या लेकींचे स्वागत होत आहे.तसे पाहिले तर एक हजार मुलांमागे ९५० इतक्या मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या व वैद्यकीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यात मुलगा हवा आहे, या हट्टापोटी अनेक स्त्रीभ्रूणहत्या झाल्या आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदरात कमालीची घट झाली होती. २००१ ते २०११ पर्यंत मुलींचे प्रमाण सर्वसामान्य इतके होते. परंतु २०१३ व २०१४ यावर्षी मुलींचे प्रमाण ९५४ ते ९६७ इतके होते. मात्र, सध्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलींचे महत्त्व वाटू लागले आहे. तसेच समूपदेशन केले जात आहे. शासनाने स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.सध्या केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग, महानगरपालिकासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी रूग्णालयात मुलींच्या जन्मासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. मुलींची घटती संख्या ही एक भयंकर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. याची जाणीव नवीन पिढीला झाली आहे. त्यामुळे नवीन पिढीमध्ये मुलगा, मुलगी असा भेद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.असा वाढत गेला मुलींचा जन्मदरविशेष म्हणजे, जिल्ह्यात स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे रोखण्यामध्ये यश आले नसले तरी शासनाच्या पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात असल्यामुळे मुलींचा जन्मदराचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात चिमूर तालुक्यात एक हजार मुलामागे सर्वाधिक मुलींचे प्रमाण ९८६ इतके आहे मागील पाच वर्षांपासून मुलीचा जन्मदर सरासरी ९३४ ते ९६७ पर्यंत गेला आहे. २०१३ ते २०१८ पर्यंतचा मुलींचा जन्मदर असा आहे. २०१३ मध्ये ८५४, २०१४ मध्ये ९६७, २०१५ मध्ये ८७७, २०१६ मध्ये ८९०, २०१७ मध्ये ९३४ व २०१८ मध्ये ९८६ इतका जन्मदर एक हजार मुलांमागे आहे.