शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

चिमूर क्रांती लढ्याचा साक्षीदार लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:10 IST

राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक स्मृती : चिमूर-वरोरा चौपदरीकरणात पूल तुटणार

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमुर : राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे. चिमूर ते वरोरा मार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने या ऐतिहासिक लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे .महात्मा गांधींनी ग्वालियर टॅन्क येथून ‘चले जाव’ ही घोषणा दिली होती. या घोषणेचे पडसाद देशभरात उमटले. १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यात देशात चिमूर व वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील घटना तेजस्वी ठरल्या. या क्रांतीची दखल शासनाने घेतली. पाठयपुस्तकात क्रांतीचा इतिहास समाविष्ट करण्यात आला.चिमूर शहरात १६ आॅगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात. १९४२ च्या क्रांतीची नोंद भारतीय इतिहासात केली आहे. मात्र, या घटनेचा साक्षीदार असलेल्या अनेक वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.विद्यार्थी व पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक वस्तुंची माहिती मिळावी, अभ्यास करता यावा, याकरीता संग्रहालय उभारण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा वारसा नष्ट होत आहे.चिमूर येथील १९४२ चा लढा देशात प्रसिद्ध असला तरी इंग्रज अधिकाºयाचा खातमा लोखंडी पुलावर क्रांतिकारकांनी केला. त्या स्थळाची म्हणजे लोखंडी पुलाची शासन दरबारी कुठेच नोंद नाही.संग्रहालय उभारण्याची गरजइतिहासातील अनेक वस्तु व वास्तुंचे शासनाकडून जतन केले जाते. मात्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर शहराने दिलेल्या योगदानाची अजूनही ठळकपणे नोंद करण्यात आली नाही. ब्रिटीश अधिकाºयांना पिटाळून लावण्याचा धाडसीपणा तालुक्यातील क्रांतिकारकांनी दाखविला होता. हा सारा इतिहास अजुनही नव्या पिढीसमोर व्यापकरित्या आला नाही. आता तर रस्ते व इमारती बांधण्याच्या हव्यासापोटी हा वारसा नष्ट करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. हा इतिहास हजारो वर्षे पे्ररणा देत राहावा, यासाठी सरकारने वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.