शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चिमूर क्रांती लढ्याचा साक्षीदार लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:10 IST

राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक स्मृती : चिमूर-वरोरा चौपदरीकरणात पूल तुटणार

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमुर : राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे. चिमूर ते वरोरा मार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने या ऐतिहासिक लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे .महात्मा गांधींनी ग्वालियर टॅन्क येथून ‘चले जाव’ ही घोषणा दिली होती. या घोषणेचे पडसाद देशभरात उमटले. १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यात देशात चिमूर व वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील घटना तेजस्वी ठरल्या. या क्रांतीची दखल शासनाने घेतली. पाठयपुस्तकात क्रांतीचा इतिहास समाविष्ट करण्यात आला.चिमूर शहरात १६ आॅगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात. १९४२ च्या क्रांतीची नोंद भारतीय इतिहासात केली आहे. मात्र, या घटनेचा साक्षीदार असलेल्या अनेक वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.विद्यार्थी व पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक वस्तुंची माहिती मिळावी, अभ्यास करता यावा, याकरीता संग्रहालय उभारण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा वारसा नष्ट होत आहे.चिमूर येथील १९४२ चा लढा देशात प्रसिद्ध असला तरी इंग्रज अधिकाºयाचा खातमा लोखंडी पुलावर क्रांतिकारकांनी केला. त्या स्थळाची म्हणजे लोखंडी पुलाची शासन दरबारी कुठेच नोंद नाही.संग्रहालय उभारण्याची गरजइतिहासातील अनेक वस्तु व वास्तुंचे शासनाकडून जतन केले जाते. मात्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर शहराने दिलेल्या योगदानाची अजूनही ठळकपणे नोंद करण्यात आली नाही. ब्रिटीश अधिकाºयांना पिटाळून लावण्याचा धाडसीपणा तालुक्यातील क्रांतिकारकांनी दाखविला होता. हा सारा इतिहास अजुनही नव्या पिढीसमोर व्यापकरित्या आला नाही. आता तर रस्ते व इमारती बांधण्याच्या हव्यासापोटी हा वारसा नष्ट करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. हा इतिहास हजारो वर्षे पे्ररणा देत राहावा, यासाठी सरकारने वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.