शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर क्रांती लढ्याचा साक्षीदार लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:10 IST

राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक स्मृती : चिमूर-वरोरा चौपदरीकरणात पूल तुटणार

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमुर : राष्ट्रसंताच्या भजनाने प्रेरीत होऊन क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध पेटून उठले. तत्कालिन इंग्रज अधिकाऱ्याचा शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या लोखंडी पुलावर खातमा करण्यात आला. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार म्हणूनच या पुलाची ओळख आहे. चिमूर ते वरोरा मार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने या ऐतिहासिक लोखंडी पुलाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे .महात्मा गांधींनी ग्वालियर टॅन्क येथून ‘चले जाव’ ही घोषणा दिली होती. या घोषणेचे पडसाद देशभरात उमटले. १६ आॅगस्ट १९४२ च्या क्रांती लढ्यात देशात चिमूर व वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील घटना तेजस्वी ठरल्या. या क्रांतीची दखल शासनाने घेतली. पाठयपुस्तकात क्रांतीचा इतिहास समाविष्ट करण्यात आला.चिमूर शहरात १६ आॅगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात. १९४२ च्या क्रांतीची नोंद भारतीय इतिहासात केली आहे. मात्र, या घटनेचा साक्षीदार असलेल्या अनेक वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.विद्यार्थी व पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक वस्तुंची माहिती मिळावी, अभ्यास करता यावा, याकरीता संग्रहालय उभारण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा वारसा नष्ट होत आहे.चिमूर येथील १९४२ चा लढा देशात प्रसिद्ध असला तरी इंग्रज अधिकाºयाचा खातमा लोखंडी पुलावर क्रांतिकारकांनी केला. त्या स्थळाची म्हणजे लोखंडी पुलाची शासन दरबारी कुठेच नोंद नाही.संग्रहालय उभारण्याची गरजइतिहासातील अनेक वस्तु व वास्तुंचे शासनाकडून जतन केले जाते. मात्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर शहराने दिलेल्या योगदानाची अजूनही ठळकपणे नोंद करण्यात आली नाही. ब्रिटीश अधिकाºयांना पिटाळून लावण्याचा धाडसीपणा तालुक्यातील क्रांतिकारकांनी दाखविला होता. हा सारा इतिहास अजुनही नव्या पिढीसमोर व्यापकरित्या आला नाही. आता तर रस्ते व इमारती बांधण्याच्या हव्यासापोटी हा वारसा नष्ट करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. हा इतिहास हजारो वर्षे पे्ररणा देत राहावा, यासाठी सरकारने वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.