शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:22 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा तिढा कायम : रस्ते नाही, दूरध्वनी सेवाही नाही

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.मुकादमगुडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून १२५ घरांच्या वस्तीत ० ते ६ वर्षे वयोगटातील ४९ बालके अंगणवाडी शाळेत दाखल आहेत. १९८७ मध्ये स्थापना झालेल्या अंगणवाडी शाळेची इमारत २००७-०८ मध्ये मानव विकास मिशन योजनेतून मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यात शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. एकीकडे तेलंगणा शासन ती वादग्रस्त १४ गावे आमच्या राज्याची असल्याचा दावा करईत आहे तर दुसरीकडे हीच गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही महाराष्ट्र शासन विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. या गावात महाराष्ट्र शासनाची बस पोहोचली नाही. जायला धड रस्ता नाही, दूरध्वनी सेवा गावात पोहोचल्या नाहीत.मानव विकास मिशन अंतर्गत गावात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र ते बांधकाम अजूनही अर्धवटच आहे. त्यामुळे आम्हाला कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यातच अंगणवाडी शाळा भरवावी लागते.-यशोधरा सत्यपाल नरवाडे,अंगणवाडी सेविका मुकादमगुडा