शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

बिरसा मुंडा यांच्या वंशजांचा दिल्लीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:01 IST

इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्र्यांची भेट : हंसराज अहीर यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रज सत्तेच्या शोषण व अत्याचारापासून देशाला स्वतंत्र करण्यास अनेक भारतीय सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रत्येक राष्ट्रीय सण, उत्सवप्रसंगी हा त्याग सर्वांना राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देत आहे. परंतु, या महान सुपूत्रांचे वंशज आज कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत, याचे स्मरण मात्र कुणी करत नाही. महान योद्धा, पराक्रमी महापुरूष भगवान बिरसा मुंडा यांचे कुटुंबीय आज अशाच दयनीय अवस्थेला तोंड देत आहेत. ही बाब माहित होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कुटुंबीयास दिल्लीमध्ये आमंत्रित केले व त्यांचा सत्कार केला.पुणे स्थित आदर्श मित्र मंडळ व श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरद्वारा गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजांना आमंत्रित केले होते. यावेळी बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा व त्यांच्या मुलींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. या कार्यक्रमास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुखराम व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार केला होता. भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करीत ना. अहीर यांनी लोकसभेत त्यांची प्रतिमा स्थापित करण्यात आल्याचे यावेळी सांगितले होते.त्यामुळे सुखराम यांनी ना. अहीर यांना विनंती करून संसदेतील ती प्रतिमा बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ना. अहीर यांनी त्यांना दिल्लीत बोलावून भगवान बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे दर्शन घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या वंशजांना दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. त्यानंतर कुटुंबीयांना संसदेतील बिरसा मुंडांच्या प्रतिमेचे दर्शन घडवून देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट करून दिली.यावेळी सुखराम यांनी आपली दयनीय परिस्थिती ना. राजनाथ सिंग यांच्यापुढे कथन केली. यावेळी ना. राजनाथ सिंह यांनी सरकार आपल्या समस्यांकडे लक्ष देईल, असे आश्वासन दिले.