शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

४२ गावांमध्ये सुरू आहे बालहक्क रक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल.

ठळक मुद्देग्राम सामाजिक परिवर्तनाचा पुढाकार : २८ नोव्हेंबरला होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखेच्या वतीने बालहक्क रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातील ८५० गावांमध्ये व जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणारी मोहीम नागरिकांना बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्त्व याबद्दल माहिती देणार आहे. मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरू झाला असून २८ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे.दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल. असे विवाह रोखण्यासाठी कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. बालविवाह कसे घातक असतात. असा विवाह होत असेल तर त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल.ग्रामसभांचा आधारया मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू झाला होता. या टप्प्यात ग्रामीण व आदिवासी भागातील गावकऱ्यांना समस्यांची माहिती देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ग्रामसभांचाही आधार घेतल्या जात आहे. बालहक्काचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचा ठरावही संमत करण्यात आला. दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सुरू करण्यात आला. यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेण्यात आल्या. बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली. युनिसेफचे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होऊन गावकऱ्यांना मोहिमेचे महत्त्व पटवून देत आहेत.