शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

४२ गावांमध्ये सुरू आहे बालहक्क रक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल.

ठळक मुद्देग्राम सामाजिक परिवर्तनाचा पुढाकार : २८ नोव्हेंबरला होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखेच्या वतीने बालहक्क रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातील ८५० गावांमध्ये व जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणारी मोहीम नागरिकांना बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्त्व याबद्दल माहिती देणार आहे. मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरू झाला असून २८ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे.दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल. असे विवाह रोखण्यासाठी कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. बालविवाह कसे घातक असतात. असा विवाह होत असेल तर त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल.ग्रामसभांचा आधारया मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू झाला होता. या टप्प्यात ग्रामीण व आदिवासी भागातील गावकऱ्यांना समस्यांची माहिती देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ग्रामसभांचाही आधार घेतल्या जात आहे. बालहक्काचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचा ठरावही संमत करण्यात आला. दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सुरू करण्यात आला. यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेण्यात आल्या. बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली. युनिसेफचे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होऊन गावकऱ्यांना मोहिमेचे महत्त्व पटवून देत आहेत.