शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

४२ गावांमध्ये सुरू आहे बालहक्क रक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल.

ठळक मुद्देग्राम सामाजिक परिवर्तनाचा पुढाकार : २८ नोव्हेंबरला होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखेच्या वतीने बालहक्क रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यातील ८५० गावांमध्ये व जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चालणारी मोहीम नागरिकांना बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्त्व याबद्दल माहिती देणार आहे. मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरू झाला असून २८ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे.दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार आहे. या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगण्यात येईल. असे विवाह रोखण्यासाठी कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. बालविवाह कसे घातक असतात. असा विवाह होत असेल तर त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल.ग्रामसभांचा आधारया मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू झाला होता. या टप्प्यात ग्रामीण व आदिवासी भागातील गावकऱ्यांना समस्यांची माहिती देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ग्रामसभांचाही आधार घेतल्या जात आहे. बालहक्काचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचा ठरावही संमत करण्यात आला. दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सुरू करण्यात आला. यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेण्यात आल्या. बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा करण्यात आली. युनिसेफचे अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होऊन गावकऱ्यांना मोहिमेचे महत्त्व पटवून देत आहेत.