शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

चंद्रपूर जिल्ह्यात बालमृत्यू आले अर्ध्यावर

By admin | Updated: July 17, 2016 00:36 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील बालमृत्यू अर्ध्यावर आले आहेत.

विविध योजनांचा परिणाम : व्हीसीडीसीतील बालकांमध्येही सुधारणामिलिंद कीर्ती चंद्रपूर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील बालमृत्यू अर्ध्यावर आले आहेत. ग्राम बाल विकास केंद्रातील (व्हीसीडीसी) प्रगती अहवालदेखील जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला दिलासा देणारा आहे. व्हीसीडीसीत दाखल १३६ बालकांपैकी ६१ टक्के बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. राजमाता जिजाऊ पोषण मिशन, आशा वर्कर, मानव विकास मिशन, आरबीएसके अशा विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य आदिवासी व इतर नागरिकांना मिळत असल्याने कुपोषणाची आकडेवारी घटली आहे.गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) राबविण्यात येत आहे. एनआरएचएमच्या माध्यमातून जिल्हात पायाभूत आरोग्य सुविधा आणि महिला व बालकांना विविध लाभ देण्याकरिता निधी उपलब्ध केला जातो. याशिवाय जननी सुरक्षा योजनेच्या माध्यतातून आशा वर्कर गरोदर महिलांची प्रसूती शासकीय दवाखान्यात होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. बालकाच्या जन्मानंतर ४२ दिवस त्याची निगरानी आशा करीत असतात. मानव विकास मिशनअंतर्गत प्रसूतीपूर्व सातव्या महिन्यात महिलेला दोन हजार रुपये आणि प्रसूतीनंतर दोन हजार असे एकूण चार हजार रुपयांचे अनुदान गरोदार महिलांची काळजी घेण्यासाठी लाभार्थ्यांना दिले जाते. बाळ आजारी पडल्यास एक वर्षपर्यंत आशा वर्कर लक्ष ठेवून असते. त्याला वेळेवर उपचार मिळावे, यासाठी आशा वर्कर लाभार्थ्याला सर्व उपचार मोफत मिळण्यासाठी दुवा म्हणून काम करीत असते. या सर्व उपाययोजनांचे आता सकारात्मक परिणाम दिसून लागले आहेत.जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१४-१५मध्ये जिल्ह्यात उपजतमृत्यूसह ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या तुलनेत यावर्षी त्याच्या अर्धे म्हणजे ४६५ बालमृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी आरोग्य विभागाने राबविलेल्या योजनांना मिळालेली पावती आहे. याशिवाय मार्च-२०१६मध्ये व्हीसीडीसीमध्ये सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतची १३६ बालके दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ८३ बालकांमध्ये सुधारणा दिसून आली. त्यापैकी २६ बालकांच्या वजनात ५ ते १० टक्के वाढ आणि ५७ बालकांच्या वजनात १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या सुधारित वजनाच्या बालकांचे प्रमाण ६१ टक्के आहे. उर्वरित ५३ बालकांच्या वजनात पाच टक्क्यांपेक्षाही कमी वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील एनआरसीमध्ये ४६ बालके दाखल करण्यात आली होती. त्यापैकी २५ बालकांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात ब्रह्मपुरी, वरोरा, मूल येथील सीटीसीचे आकडे उपलब्ध करण्यात आले असून त्यामध्ये ब्रह्मपुरीत दाखल सर्व चार बालकांमध्ये सुधारणा दिसून आली. वरोऱ्यात चारपैकी दोन बालकांमध्ये सुधारणा आणि मूलमध्ये १० बालकांपैकी पाच बालकांमध्ये सुधारणा झाली.गेल्या १०-१२ वर्षांत चांगल्या दर्जाच्या बाल आरोग्य योजना राबविण्यात आल्या. शासनस्तरावरून प्रसूती दवाखान्यातच होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. ग्रामीण भागातील आजारी बालके शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले जातात. त्यामुळे ग्रामीणपेक्षा शहरी बालमृत्यू अधिक दिसतात.- डॉ. श्रीराम गोगुलवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.कुपोषण कमी होण्यासाठी व्हीसीडीसीमध्ये बालकांवर लक्ष ठेवण्यात येते. गरोदर मातांची काळजी घेण्याचे काम आशा वर्कर करीत असतात. महिला व बालकांना योग्य पोषण आहार दिला जातो. यातून सॅम व मॅमधील बालकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे.- विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (महिला व बालकल्याण), जि.प. चंद्रपूर.दरहजारी ३.३२ बालमृत्यूजिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९५५ बालकांपैकी दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण काढण्यात आलेले आहे. त्यामध्ये या वर्षीचे ४६५ बालमृत्यू दरहजारी केवळ ३.३२ आहे. हे प्रमाण गेल्यावर्षी दरहजारी ५.०९ होते. यावर्षी ग्रामीण भागात दरहजारी १.४९ बालमृत्यू आणि शहरी भागात दरहजारी १२.११ बालमृत्यू झाले आहेत. तेच प्रमाण गेल्या वर्षी ग्रामीण भागात १.७५ व शहरी भागात २३.८५ दरहजारी होते.