शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:07 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलेत. त्यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधल्याबद्दल सरपंच यांनी आनंद व्यक्त केला असून गावातील दुष्काळाच्या संदर्भातील समस्या लगेच सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदुष्काळावर उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलेत. त्यांनी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधल्याबद्दल सरपंच यांनी आनंद व्यक्त केला असून गावातील दुष्काळाच्या संदर्भातील समस्या लगेच सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'आॅडिओ ब्रीज सिस्टीम' मार्फत जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. टंचाई जाणवणाऱ्या भागातील नेमकी परिस्थिती काय आहे? प्रशासन कुठे मागे आहे? समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल? याबाबत थेट सरपंचांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.गावागावातील नळ योजनेसंदर्भातील समस्या, पाण्याचे स्रोत असणाºया नद्यांची समस्या, विहिरी, विंधन विहिरींची समस्या, तसेच जिल्ह्यामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या, याबाबत सरपंचांनी आपले मत निर्भयपणे या संवादातून मांडले. जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई पुढे आली आहे. मात्र बहुतेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा खंडित आहे. जिल्ह्यांमध्ये आजमितीला एकही टँकर सुरू नाही. तथापि, पाईपलाईन फुटणे, नळ योजनेच्या विहिरीला पाणी नसणे, वीज देयके प्रलंबित असणे, रोजगार हमीच्या कामाची सुरुवात करणे, आदी समस्या यावेळी सरपंचांनी मांडल्या.