लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. त्यातच यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविले आहे. खत कंपन्याकडून खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. मागील काही वर्षांत खताच्या किमती सातत्याने वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागतकेली असून काही ठिकाणी पेरणी सुद्धा झाली आहे. मात्र पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.नियोजन बिघडलेकोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. काहींना लॉकडाऊनमुळे शेतमाल विकता आला नाही. तर काहींनी भाववाढ होतील, या आशेने शेतमाल घरात भरून ठेवला आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्येच मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजीती झाली. आता शेतीहंगाम सुरू झाला आहे. मात्र पैसा नसल्याने पेरणी कशी करायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काहींनी उसनवारीने तसेच पीक कर्ज घेऊन बी-बियानांची सोय केली आहे. मात्र पुढील शेतीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.त्यामुळे शेतमालाला योग्य भाव द्यावा, शेतीसाठी खत, बियानांची पुरवठा करावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे अनुदान त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी, आदी मागण्या शेतकºयांनी केल्या आहे.
रासायनिक खतांमुळे शेती खर्च वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST
कोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. काहींना लॉकडाऊनमुळे शेतमाल विकता आला नाही. तर काहींनी भाववाढ होतील, या आशेने शेतमाल घरात भरून ठेवला आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्येच मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजीती झाली. आता शेतीहंगाम सुरू झाला आहे. मात्र पैसा नसल्याने पेरणी कशी करायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काहींनी उसनवारीने तसेच पीक कर्ज घेऊन बी-बियानांची सोय केली आहे.
रासायनिक खतांमुळे शेती खर्च वाढला
ठळक मुद्देखतांच्या किंमती अवाक्याबाहेर : मोफत पुरवठा करण्याची मागणी