शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, जस्ताचे प्रमाण तपासले जातात.

ठळक मुद्देपिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे : अधिकाधिक शेतकऱ्यांनी द्यावी सेंद्रीय खताला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेत जमिनीची खोली, मातीच्या कणांची रचना, निचरा, भुसभुशीतपणा, उपलब्ध दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण, सुक्ष्म जिवाणूंची संख्या आदींवर जमिनीची सुपिकता अवलंबून असते. जमिनीचा पोत व जडण-घडण यावरच जमिनीचा पोत अवलंबून असते. मात्र उत्पादनासाठी रासायानिक खतांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर तसेच सेंद्रीय खतांची कमतरता यामुळे जमिनीचा ºहास होत आहे. परिणामी जिल्ह्यातील जमिनीची सुपिकता दरवर्षी ढासळत आहे.जमिनीची सुपिकता ही माती परीक्षातून ठरविली जाते. माती परीक्षणावरून प्रयोगशाळेत जमिनीचे विविध भौतिक, रासायनिक, गुणधर्म तपासले जातात. जलधारण क्षमता, आकार घनता, जमिनीचा पोत, ओलाव्याचे प्रमाण तर रासायनिक गुणधर्मात सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश युक्त कॅल्शीयम व मॅग्नेशीयम, चुना, तांबे, लोह, जस्ताचे प्रमाण तपासले जातात. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मृदा तपासणी न करताच पेरणी करतात. परिणामी अनेकवेळा नुकसानीला जामोरे जावे लागते.दरवर्षी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मृदा तपासणी करण्याचे आवाहन केले जाते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माती परिक्षणासाठी अत्यल्प नमूने प्रयोगशाळेत आले आहे. जमीन ही एक सजीव संस्था आहे. यात अनेक सुक्ष्म जीवजंतू (जीवाणू, बुरशी व इतर सुक्ष्म सजीव घटक) व प्राणी (गांडुळ) यांचा अधिवास असतोे. जमिनीस जैविक गुणधर्म प्राप्त होतात. तर जमिनीत असलेल्या खनिजामुळे व भौगोलिक घटकांमुळे जमिनीला भौतिक व रासायनिक गुणधर्म (जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण) प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकवर्षी शेतकºयांनी माती परिक्षण करून त्यानुसार द्रव्याचे प्रमाण कमी-अधिक करून पेरणी केल्यास उत्पादनात निश्चितच भर पडेल, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यावर्षी खरीप हंगाम कोरोनाच्या संकटात अडकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी परीक्षण न करताच पेरणी आटोपली.उत्पादनात वाढ होण्यासाठी नैसर्गिक घटक आवश्यकमृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रीय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा हे घटक असतात. या घटकांचे प्रमाण योग्य राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ व सातत्य राखण्यास शक्य होणार आहे.मृदा तयार होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.संतुलित खतांचे वापरअसंतुलित खत वापराने जमिनीचे आरोग्य बिघडत असून अशा जमिनीमध्ये सेंद्रीय पदार्थांचा वापर अधिक प्रमाणात करणे आवश्यक आहे. उत्पादन वाढीसाठी संकरित व अधिक उत्पादनक्षम जातींच्या बियाणांचा वापर वाढला आहे.जमिनीच्या आरोग्याची गुरूकिल्ली सामूजमिनीचा सामू सात असल्यास जमीन उदासीन प्रकारात मोडते. सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी व सातपेक्षा जास्त असल्यास विम्लधर्मी. सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान सामू असल्यास पिकांना योग्य अन्नद्रव्ये जमिनीत मिळतात

टॅग्स :agricultureशेती