शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

व्यावसायिकांचे वजनकाटे तपासावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST

चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले ...

चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा

चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या या रस्त्यावरून वाहनधारक सुसाट आपले वाहने पळवित आहेत. दरम्यान, रस्त्याच्या मधात असलेल्या मोठ्या वृक्षांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे येथील वृक्ष हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

वीज खांबांची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : शहरातील जुन्या वस्त्यांमधील काही भागातील वीज खांब वाकले आहेत. त्यामुळे या खांबांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत उभे आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे

चंद्रपूर : शहरातील दुर्गापूर रस्त्यावरील पोलीस सभागृह परिसरात काही फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून, व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.

अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील गांधी चौक, तुकूम, जटपुरागेटपर्यंत रस्ता रुंदीकरण केले जात आहे; मात्र अनेकांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रथम अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही

चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

प्रदूषित वाहनांवर बंदी घाला

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. वाहनांद्वार प्रदूषणात वाढ होत आहे.

‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसे

चंद्रपूर : शहरातील काही ‘एटीएम’ केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळामध्ये एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे; मात्र शहरातील बहुतांश ‘एटीएम’मध्ये ही सुविधाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बंगाली कॅम्प भाजीबाजारात कचरा

चंद्रपूर: येथील बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.