शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांचे वजनकाटे तपासावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST

चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले ...

चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा

चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या या रस्त्यावरून वाहनधारक सुसाट आपले वाहने पळवित आहेत. दरम्यान, रस्त्याच्या मधात असलेल्या मोठ्या वृक्षांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे येथील वृक्ष हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

वीज खांबांची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : शहरातील जुन्या वस्त्यांमधील काही भागातील वीज खांब वाकले आहेत. त्यामुळे या खांबांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत उभे आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे

चंद्रपूर : शहरातील दुर्गापूर रस्त्यावरील पोलीस सभागृह परिसरात काही फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून, व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.

अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील गांधी चौक, तुकूम, जटपुरागेटपर्यंत रस्ता रुंदीकरण केले जात आहे; मात्र अनेकांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रथम अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही

चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

प्रदूषित वाहनांवर बंदी घाला

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. वाहनांद्वार प्रदूषणात वाढ होत आहे.

‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसे

चंद्रपूर : शहरातील काही ‘एटीएम’ केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळामध्ये एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे; मात्र शहरातील बहुतांश ‘एटीएम’मध्ये ही सुविधाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बंगाली कॅम्प भाजीबाजारात कचरा

चंद्रपूर: येथील बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.