शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

व्यावसायिकांचे वजनकाटे तपासावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST

चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले ...

चौपदरीकरणामुळे नागरिकांना दिलासा

चंद्रपूर : शहरातील पाणी टाकी, इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या या रस्त्यावरून वाहनधारक सुसाट आपले वाहने पळवित आहेत. दरम्यान, रस्त्याच्या मधात असलेल्या मोठ्या वृक्षांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे येथील वृक्ष हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

वीज खांबांची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : शहरातील जुन्या वस्त्यांमधील काही भागातील वीज खांब वाकले आहेत. त्यामुळे या खांबांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक दिवसांपासून खांब वाकलेल्या अवस्थेत उभे आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे

चंद्रपूर : शहरातील दुर्गापूर रस्त्यावरील पोलीस सभागृह परिसरात काही फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून, व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.

अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही भागांमध्ये अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

अतिक्रमण हटविण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील गांधी चौक, तुकूम, जटपुरागेटपर्यंत रस्ता रुंदीकरण केले जात आहे; मात्र अनेकांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रथम अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही

चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

प्रदूषित वाहनांवर बंदी घाला

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. वाहनांद्वार प्रदूषणात वाढ होत आहे.

‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसे

चंद्रपूर : शहरातील काही ‘एटीएम’ केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळामध्ये एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे; मात्र शहरातील बहुतांश ‘एटीएम’मध्ये ही सुविधाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बंगाली कॅम्प भाजीबाजारात कचरा

चंद्रपूर: येथील बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.