शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामीण भागात स्मार्ट कार्डच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: February 15, 2015 00:42 IST

भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ...

बल्लारपूर : भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून पैसे उखळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. ‘स्मार्ट कॉर्ड’ च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असून तहसील प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.मागील चार-पाच दिवसांपूर्वी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे काही तरुणांनी स्मार्ट कॉर्ड तयार करून देण्याच्या नावाखाली आधार ओळखपत्र, निवडणूक ओळखपत्र, दोन पास पोर्ट फोटो व प्रत्येकांचे स्मार्ट कॉर्डसाठी प्रति व्यक्ति दहा रुपये जमा करण्याचे धोरण अवलंबिले. काहींनी याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे जमा करणाऱ्यांकडून अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. कोणाकडून परवानगी आहे, याची विचारणा केली असता टोलवाटोलवी करणारे उत्तरे देण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. यामुळे नागरिकांना लुबाडणूक करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.असाच प्रकार तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई आदी गावातही सुरू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांकडून जमा करण्यात येत असलेल्या कागदपत्राचा दुरूपयोग तर होणार नाही ना, अशी शंका नागरिकात वर्तविली जात आहे. सामान्य नागरिक या टोळीच्या भ्रामक जाळात अडकले जात आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहे. ‘स्मार्ट कार्ड’ कोणत्या एजन्सी मार्फत काढले जात आहे, याचा उलगडा आजतागायत झाला नाही. ‘आधार’ ओळखपत्र बंद करणार आहे, हे सांगण्याचे औचित्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘स्मार्ट कार्ड’ तयार करून देण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त स्थितीत जोर पकडला आहे. हे लोन इतरत्र पसरण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने यावर आळा घालणे आवश्यक असून याचा उलघडा त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पैसे उखळून गोरखधंदा चालविणाऱ्या टोळीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार मात्र अद्यापही कोणाकडून करण्यात आली नाही, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)