शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

ग्रामीण भागात स्मार्ट कार्डच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: February 15, 2015 00:42 IST

भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून ...

बल्लारपूर : भारत सरकारचे ‘आधार’ ओळखपत्र बंद होणार आहे. यानंतर नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ उपयोगी पडणार आहे, अशी थाप मारून बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून पैसे उखळण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. ‘स्मार्ट कॉर्ड’ च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असून तहसील प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.मागील चार-पाच दिवसांपूर्वी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे काही तरुणांनी स्मार्ट कॉर्ड तयार करून देण्याच्या नावाखाली आधार ओळखपत्र, निवडणूक ओळखपत्र, दोन पास पोर्ट फोटो व प्रत्येकांचे स्मार्ट कॉर्डसाठी प्रति व्यक्ति दहा रुपये जमा करण्याचे धोरण अवलंबिले. काहींनी याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे जमा करणाऱ्यांकडून अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. कोणाकडून परवानगी आहे, याची विचारणा केली असता टोलवाटोलवी करणारे उत्तरे देण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. यामुळे नागरिकांना लुबाडणूक करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.असाच प्रकार तालुक्यातील मानोरा, इटोली, कवडजई आदी गावातही सुरू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. स्मार्ट कार्डच्या नावाखाली नागरिकांकडून जमा करण्यात येत असलेल्या कागदपत्राचा दुरूपयोग तर होणार नाही ना, अशी शंका नागरिकात वर्तविली जात आहे. सामान्य नागरिक या टोळीच्या भ्रामक जाळात अडकले जात आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात आहे. ‘स्मार्ट कार्ड’ कोणत्या एजन्सी मार्फत काढले जात आहे, याचा उलगडा आजतागायत झाला नाही. ‘आधार’ ओळखपत्र बंद करणार आहे, हे सांगण्याचे औचित्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘स्मार्ट कार्ड’ तयार करून देण्याच्या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्राप्त स्थितीत जोर पकडला आहे. हे लोन इतरत्र पसरण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने यावर आळा घालणे आवश्यक असून याचा उलघडा त्वरित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पैसे उखळून गोरखधंदा चालविणाऱ्या टोळीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाकडे याची तक्रार मात्र अद्यापही कोणाकडून करण्यात आली नाही, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)