शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कामांची गती मंदावली

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे.

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची दमछाक: ग्रामीण विकासाला लागणार ब्रेकसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे. प्रभार सांभाळताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विकास कामात अनेक अडचणी येत असल्याने ‘टार्गेट’ पूर्ण कसे होणार, असा प्रश्न आता कार्यरत अधिकाऱ्यांना पडला आहे.मागील एक वर्षांपासून येथील मुख्य कार्यपालन अधिकारी स्थायी नव्हते. शिंदे यांची बदली झाल्यानंतर सी.एस. डहाळकर यांच्याकडे जिल्हा परिषदेचा प्रभार आला. त्यानंतर डॉ. माधुरी खोडे आल्या. त्या काही दिवस येथे राहिल्यानंतर त्यांची भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर संपदा मेहतांनी पदभार सांभाळला. मात्र त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. आता कुठे आशुतोष सलिल यांच्या रुपाने जिल्हा परिषदेला स्थायी मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाले आहेत. मात्र तोपर्यंत जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांची बदली झाली तर काही सेवानिवृत्त झाले.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या अर्ध्याअधिक विभागाचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे अनेक कामात अडचणी येत असून विकास कामांची आशा असलेल्या नागरिकांची निराशा होत आहे.येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही कुणीही आले नसल्याने त्यांचा प्रभार गटशिक्षणाधिकारी रामदास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कार्यकारी बांधकाम अधिकारी मून सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार शेट्टी यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार पवार यांच्याकडे होता. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंचन विभागाची जबाबदारी नागदेवते यांच्याकडे होती. ते सेवाविृत्त झाल्याने त्यांच्या भार बगमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक रविकांत देशपांडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. तेही रवाना होणार आहेत. मात्र त्यांच्या जागेवर अद्यापही कुणीही आले नाही. समाजकल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांच्याकडे जात पडताळणी कार्यालयाचा अतिरिक्त भार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेची जबाबदारी आहे. काही विभागात प्रभारी असल्याने तर काही विभागात दोन ते तीन विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांचीही दमछाक होत आहे.