शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कामांची गती मंदावली

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे.

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची दमछाक: ग्रामीण विकासाला लागणार ब्रेकसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे. प्रभार सांभाळताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विकास कामात अनेक अडचणी येत असल्याने ‘टार्गेट’ पूर्ण कसे होणार, असा प्रश्न आता कार्यरत अधिकाऱ्यांना पडला आहे.मागील एक वर्षांपासून येथील मुख्य कार्यपालन अधिकारी स्थायी नव्हते. शिंदे यांची बदली झाल्यानंतर सी.एस. डहाळकर यांच्याकडे जिल्हा परिषदेचा प्रभार आला. त्यानंतर डॉ. माधुरी खोडे आल्या. त्या काही दिवस येथे राहिल्यानंतर त्यांची भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर संपदा मेहतांनी पदभार सांभाळला. मात्र त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. आता कुठे आशुतोष सलिल यांच्या रुपाने जिल्हा परिषदेला स्थायी मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाले आहेत. मात्र तोपर्यंत जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांची बदली झाली तर काही सेवानिवृत्त झाले.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या अर्ध्याअधिक विभागाचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे अनेक कामात अडचणी येत असून विकास कामांची आशा असलेल्या नागरिकांची निराशा होत आहे.येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही कुणीही आले नसल्याने त्यांचा प्रभार गटशिक्षणाधिकारी रामदास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कार्यकारी बांधकाम अधिकारी मून सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार शेट्टी यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार पवार यांच्याकडे होता. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंचन विभागाची जबाबदारी नागदेवते यांच्याकडे होती. ते सेवाविृत्त झाल्याने त्यांच्या भार बगमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक रविकांत देशपांडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. तेही रवाना होणार आहेत. मात्र त्यांच्या जागेवर अद्यापही कुणीही आले नाही. समाजकल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांच्याकडे जात पडताळणी कार्यालयाचा अतिरिक्त भार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेची जबाबदारी आहे. काही विभागात प्रभारी असल्याने तर काही विभागात दोन ते तीन विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांचीही दमछाक होत आहे.