शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कामांची गती मंदावली

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे.

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची दमछाक: ग्रामीण विकासाला लागणार ब्रेकसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे. प्रभार सांभाळताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विकास कामात अनेक अडचणी येत असल्याने ‘टार्गेट’ पूर्ण कसे होणार, असा प्रश्न आता कार्यरत अधिकाऱ्यांना पडला आहे.मागील एक वर्षांपासून येथील मुख्य कार्यपालन अधिकारी स्थायी नव्हते. शिंदे यांची बदली झाल्यानंतर सी.एस. डहाळकर यांच्याकडे जिल्हा परिषदेचा प्रभार आला. त्यानंतर डॉ. माधुरी खोडे आल्या. त्या काही दिवस येथे राहिल्यानंतर त्यांची भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर संपदा मेहतांनी पदभार सांभाळला. मात्र त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. आता कुठे आशुतोष सलिल यांच्या रुपाने जिल्हा परिषदेला स्थायी मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाले आहेत. मात्र तोपर्यंत जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांची बदली झाली तर काही सेवानिवृत्त झाले.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या अर्ध्याअधिक विभागाचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे अनेक कामात अडचणी येत असून विकास कामांची आशा असलेल्या नागरिकांची निराशा होत आहे.येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही कुणीही आले नसल्याने त्यांचा प्रभार गटशिक्षणाधिकारी रामदास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कार्यकारी बांधकाम अधिकारी मून सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार शेट्टी यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार पवार यांच्याकडे होता. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंचन विभागाची जबाबदारी नागदेवते यांच्याकडे होती. ते सेवाविृत्त झाल्याने त्यांच्या भार बगमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक रविकांत देशपांडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. तेही रवाना होणार आहेत. मात्र त्यांच्या जागेवर अद्यापही कुणीही आले नाही. समाजकल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांच्याकडे जात पडताळणी कार्यालयाचा अतिरिक्त भार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेची जबाबदारी आहे. काही विभागात प्रभारी असल्याने तर काही विभागात दोन ते तीन विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांचीही दमछाक होत आहे.