शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कामांची गती मंदावली

By admin | Updated: June 19, 2014 00:00 IST

ग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे.

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची दमछाक: ग्रामीण विकासाला लागणार ब्रेकसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरग्रामीण विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांऱ्याव्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामाचा खोळंबा होत आहे. प्रभार सांभाळताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. विकास कामात अनेक अडचणी येत असल्याने ‘टार्गेट’ पूर्ण कसे होणार, असा प्रश्न आता कार्यरत अधिकाऱ्यांना पडला आहे.मागील एक वर्षांपासून येथील मुख्य कार्यपालन अधिकारी स्थायी नव्हते. शिंदे यांची बदली झाल्यानंतर सी.एस. डहाळकर यांच्याकडे जिल्हा परिषदेचा प्रभार आला. त्यानंतर डॉ. माधुरी खोडे आल्या. त्या काही दिवस येथे राहिल्यानंतर त्यांची भंडारा येथे बदली झाली. त्यानंतर संपदा मेहतांनी पदभार सांभाळला. मात्र त्यांची गडचिरोली येथे बदली झाली. आता कुठे आशुतोष सलिल यांच्या रुपाने जिल्हा परिषदेला स्थायी मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाले आहेत. मात्र तोपर्यंत जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांची बदली झाली तर काही सेवानिवृत्त झाले.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सध्या अर्ध्याअधिक विभागाचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे अनेक कामात अडचणी येत असून विकास कामांची आशा असलेल्या नागरिकांची निराशा होत आहे.येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ओमप्रकाश गुढे यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही कुणीही आले नसल्याने त्यांचा प्रभार गटशिक्षणाधिकारी रामदास पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कार्यकारी बांधकाम अधिकारी मून सेवानिवृत्त झाले. त्यांचा प्रभार शेट्टी यांच्याकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार पवार यांच्याकडे होता. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांचा प्रभार गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंचन विभागाची जबाबदारी नागदेवते यांच्याकडे होती. ते सेवाविृत्त झाल्याने त्यांच्या भार बगमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक रविकांत देशपांडे यांची नांदेड येथे बदली झाली आहे. तेही रवाना होणार आहेत. मात्र त्यांच्या जागेवर अद्यापही कुणीही आले नाही. समाजकल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांच्याकडे जात पडताळणी कार्यालयाचा अतिरिक्त भार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेची जबाबदारी आहे. काही विभागात प्रभारी असल्याने तर काही विभागात दोन ते तीन विभागाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांचीही दमछाक होत आहे.