शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

छप्परे उडाली, संसार उघड्यावर

By admin | Updated: March 18, 2017 00:36 IST

राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले.

चिंचोलीत कहरगोवरी : राजुरा तालुक्यातील चिंचोली (खुर्द) येथे गुरूवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाले. यात कोणतीही जिवित हाणी झाली नसली तरी घरांचे नुकसान होऊन अनेकांचा संसारच उघड्यावर आला. गोवरी-चिंचोली परिसरात अचानक सायंकाळी आलेल्या वादळाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यात चिंचोली (खुर्द) येथील अरुणा काळे, शरद टोंगे यांच्या घराची छप्पर उडाली. वादळाने किसन देवाळकर, कवडू भगत, गजानन वैद्य, संतोष देवाळकर, गणेश काळे यांच्या गोठ्यावरील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने उडून गेली. वादळाने सर्वत्र हाहाकार झाल्याने विस्कटलेला संसार व उडून गेलेले घरावरील लाकुड-फाटा शोधण्यासाठी एकच धावपड उडाली. अनेक शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा, तुरीची कापणी केली होती. मात्र सर्व पावसाने भिजले आहे. आठ दिवसापूर्वी मानोली, नागपूर, कढोली, कोलगाव परिसरात आलेल्या वादळाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुन्हा गुरूवारी वदाळाचा तडाखा बसला. चिंचोली येथील अरुणाबाई काळे, शरद टोंगे, कवडू भगत यांच्या राहत्या घरी १० क्विंटल कापूस ठेवला होता. मात्र वादळाने छप्पर उडाले व त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने लाख मोलाचा कापूस व सर्व जीवनावश्यक वस्तू पूर्णत: भिजून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अन् मोठा अनर्थ टळला वादळी वाऱ्याने क्षणार्धात काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले. चिंचोली येथील अरुणा काळे यांच्या घरी त्यांची मुलगी नुकत्याच जन्मलेल्या लहानशा लेकराला घेऊन होती. घराचे छप्पर उडेल याची कुणालाच कल्पना नव्हती. परंतु, वाऱ्याने अलगद घरावरील छप्पर उडाले. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. वादळामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी विजेचे खांब तुटले आणि २४ तासांपासून वीज पुरवठा खंडीत होता.चना, गहू, मिरची, तूर पिकांचे नुकसान बल्लारपूर तालुक्यालाही दुसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसला. यात चना, गहूृ, मिरची, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अखेरच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत.