शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासह अनेक क्षेत्रांमध्ये अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST

फोटो चंद्रपूर : सत्ता कुणाचीही असो, जनतेच्या हितासाठी आवाज उठविलाच पाहिजे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये ...

फोटो

चंद्रपूर : सत्ता कुणाचीही असो, जनतेच्या हितासाठी आवाज उठविलाच पाहिजे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये जिल्ह्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरित परिणाम झाला. दारू विक्री व कोंबड बाजार सुरू झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या प्रश्नांकडे पालकमंत्री लक्ष देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा व संपर्क मंत्र्यांना पाठवावे अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नरेश पुगलिया धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कोरोना महामारीकडे दुर्लक्ष, अमली पदार्थाची तस्करी, दारू तस्करी, रेती तस्करी अशा अनेक अवैध धंदे व अनागोंदी कारभार थांबविण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात पुगलिया यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पुगलिया म्हणाले, महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब कन्नमवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा एक असताना या जिल्ह्यात औद्येगिक क्रांती, रस्ते, पूल व इतर विकासाची वाटचाल सुरू झाली. या विकासाभिमुख औद्योगिक जिल्ह्यात एक चांगले व जनतेला पोषक वातावरण असताना आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्याचे वातावरण भ्रष्ट व दूषित झाले आहे. या जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे ९० टक्के मृत्यूचे प्रमाण शासकीय मेडिकल व जिल्हा रूग्णालयात आहे व याउलट खासगी दवाखान्यात मृत्यूचे प्रमाण फक्त १० टके आहे. एवढी मोठी तफावत आरोग्य सेवेत का? आणि ही परिस्थिती ओढायला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एवढया प्रमाणात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व शासकीय दवाखान्यात डॉक्टरांची व इतर आरोग्य सेवकांची त्वरित पूर्तता करण्यात यावी, या जिल्ह्यातील अवैध धंद्यांना उत आला आहे. रेती तस्करी, दारू तस्करी, कोळसा तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, कोंबड बाजार, हत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटका एम्टातून साडेचार लाख टन कोळसा चोरी जाणे ही बाब या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, हे सांगणारी आहे. याला आळा बसणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, अविनाश ठावरी, अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.

बॉक्स

मुख्यमंत्र्यांना पत्र

याबाबत पुगलिया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून महाराष्टÑसारखा पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपल्या राज्यातील जिल्हास्तरापासून तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत विकासाचा दृष्टीकोन तसेच कोरोनासारखा महामारीत जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी जिल्ह्यात एक सक्षम प्रमाणिक चारित्र्यवान मंत्री त्वरित द्यावा व वरील प्रश्नावर आपल्या स्तरावर योग्य मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांनीसुद्धा पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जनतेला न्याय द्यावा, ही अपेक्षा व्यक्त केली आहे.