शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

आरोग्यासह अनेक क्षेत्रांमध्ये अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST

फोटो चंद्रपूर : सत्ता कुणाचीही असो, जनतेच्या हितासाठी आवाज उठविलाच पाहिजे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये ...

फोटो

चंद्रपूर : सत्ता कुणाचीही असो, जनतेच्या हितासाठी आवाज उठविलाच पाहिजे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये जिल्ह्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरित परिणाम झाला. दारू विक्री व कोंबड बाजार सुरू झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या प्रश्नांकडे पालकमंत्री लक्ष देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा व संपर्क मंत्र्यांना पाठवावे अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नरेश पुगलिया धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कोरोना महामारीकडे दुर्लक्ष, अमली पदार्थाची तस्करी, दारू तस्करी, रेती तस्करी अशा अनेक अवैध धंदे व अनागोंदी कारभार थांबविण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात पुगलिया यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पुगलिया म्हणाले, महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब कन्नमवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा एक असताना या जिल्ह्यात औद्येगिक क्रांती, रस्ते, पूल व इतर विकासाची वाटचाल सुरू झाली. या विकासाभिमुख औद्योगिक जिल्ह्यात एक चांगले व जनतेला पोषक वातावरण असताना आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्याचे वातावरण भ्रष्ट व दूषित झाले आहे. या जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे ९० टक्के मृत्यूचे प्रमाण शासकीय मेडिकल व जिल्हा रूग्णालयात आहे व याउलट खासगी दवाखान्यात मृत्यूचे प्रमाण फक्त १० टके आहे. एवढी मोठी तफावत आरोग्य सेवेत का? आणि ही परिस्थिती ओढायला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एवढया प्रमाणात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व शासकीय दवाखान्यात डॉक्टरांची व इतर आरोग्य सेवकांची त्वरित पूर्तता करण्यात यावी, या जिल्ह्यातील अवैध धंद्यांना उत आला आहे. रेती तस्करी, दारू तस्करी, कोळसा तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, कोंबड बाजार, हत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटका एम्टातून साडेचार लाख टन कोळसा चोरी जाणे ही बाब या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, हे सांगणारी आहे. याला आळा बसणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, अविनाश ठावरी, अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.

बॉक्स

मुख्यमंत्र्यांना पत्र

याबाबत पुगलिया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून महाराष्टÑसारखा पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपल्या राज्यातील जिल्हास्तरापासून तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत विकासाचा दृष्टीकोन तसेच कोरोनासारखा महामारीत जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी जिल्ह्यात एक सक्षम प्रमाणिक चारित्र्यवान मंत्री त्वरित द्यावा व वरील प्रश्नावर आपल्या स्तरावर योग्य मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांनीसुद्धा पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जनतेला न्याय द्यावा, ही अपेक्षा व्यक्त केली आहे.