शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

संविधान सन्मान रॅलीने चंद्रपूरनगरी दुमदुमली

By admin | Updated: November 27, 2015 01:18 IST

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी पं. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान, संविधान सभेचे अध्यक्ष....

शेकडो नागरिकांचा सहभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीचा पुढाकारचंद्रपूर : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पं. पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान, संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केले. याच ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती, चंद्रपूरच्या वतीने संविधान सन्मान दिनानिमीत्य चंद्रपुरातून गुरूवारी संविधान सन्मान रॅली काढली. या रॅलीत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.सकाळी ८ वाजता समता सैनिक दल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुरातील मुख्य मार्गावरुन आंबेडकरी युवकांची बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, सूरज कदम, स्नेहल रामटेके, त्रिरत्न मुन, वैभव रामटेके, आशिष कीर्तक आदींनी केले. राष्ट्रध्वज घेवून बाईक रॅली काढण्यात आली. संविधान सन्मान रॅलीसाठी राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्स प्राय. लिमीटेडचे संचालक सोमेश्वर येलचलवार यांनी वाहतुकीवर निमंत्रणासाठी आपले २५ सुरक्षा रक्षक मोफत उपलब्ध करून दिले. दुपारी १ वाजता संविधान रॅलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप दिवान, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज उचलून रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी भूषविले. संचालन विशाल अलोणे यांनी तर प्रास्ताविक प्रतीक डोर्लीकर यांनी केले. आभार राजेश वनकर यांनी मानले.रॅलीच्या यशस्वीतेकरीता व्ही.डी. मेश्राम, खुशाल तेलंग, सत्यजीत खोब्रागडे, एस.टी. चिकटे, राजु खोब्रागडे, नितीन रामटेके, वामन सरदार, हरीश दुर्योधन, अ.वी. टेंभरे, कोमल खोब्रागडे, बाजीराव उंदीरवाडे, शेषराव सहारे, अशोक फुलझेले, महादेव कांबळे, इ.एस. मेश्राम, राजकुमार जवादे, सिध्दार्थ वाघमारे, रवि मुन, प्रेमदास बोरकर, राजू कीर्तक, तेजराज भगत, रामजी जुनघरे, तथागत पेटकर, मनोज भैसारे यांनी परीश्रम घेतले.(स्थानिक प्रतिनिधी)संविधान हा अमूल्य ठेवासंविधान सन्मान रॅलीनंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमामध्ये डॉ. ए. पी. पील्लई यांनी संविधानातील विविध तरतुदी विषयी मार्गदर्शन करताना संविधान भारतासाठी अमुल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन केले. भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर आधारीत आहे व प्रत्येक भारतीयांसाठी संविधानाच्या तरतुदी असून भारताच्या एकात व अखंडतेसाठी प्रेरक असल्याचे नागपूरवरुन आलेले प्रमुख वक्ते अ‍ॅड. संदेश भालेकर यांनी सांगितले.