शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

उकाड्यामुळे चंद्रपूरकर हैराण

By admin | Updated: May 19, 2016 00:40 IST

दक्षिणेकडे निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भातील आर्द्रता कमालीची वाढली आहे.

आर्द्रता वाढली : तापमानात तात्पुरती घटचंद्रपूर : दक्षिणेकडे निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भातील आर्द्रता कमालीची वाढली आहे. चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आज बुधवारी तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. दिवसभरच उकाडा कायम राहिला. त्यामुळे घामाने चिंब भिजत असलेले नागरिक वैतागल्याचे दिसून आले. चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा सर्वांनाच ठाऊक आहे आणि नकोसा वाटणारा आहे. दरवर्षीच मे महिन्यात सुर्याचा प्रकोप जिल्हावासीयांना पाहायला मिळतो. यावर्षी उन्हाळ्याची चाहुल जरा उशिरानेच लागली. त्यातही अनेकवेळा अकाली पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत तापमान वाढत असल्याचे जाणवले नाही. मात्र त्यानंतर उन्हाची काहिली असह्य होऊ लागली. एप्रिल महिन्याच्या अखेर व मे महिन्याच्या प्रारंभी कडक उन्हाळा सुरू झाला. अशातच मागील तीन-चार दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. चंद्रपुरातील नागरिक गेल्या तीन ते चार दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघत आहेत. शनिवारी चंद्रपुरात तब्बल ४६ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान यावर्षीचे सर्वाधिक तापमान ठरले असून राज्यातही चंद्रपूर जिल्ह्याचे शनिवारचे तापमान सर्वाधिक ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसून येतात. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र असताना मे महिन्यात तसे अनुभवायला मिळाले आहे. मे महिन्याचा आठवडा लोटल्यानंतर सूर्याने आग ओकणे सुरू केले असून मेच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपूरचे ४५ अंशापर्यंत पोहचले होते. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असाह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत असल्याने नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, हे विशेष.दरम्यान, आज बुधवारी चंद्रपुरात ४४.० अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानात मागील चार दिवसांच्या तुलनेत घट झाली असली तरी आज संपूर्ण जिल्ह्यातच वातावरण विचित्र होते. दक्षिणेकडे चक्रीवादाळाची स्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्याच्या वातावरणातील आर्द्रता वाढल्याचे ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या प्रकारामुळे बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. साधे झाडाचे पानही कुठे हलताना दिसत नव्हते. ढगाळ वातावरण असले तरी उकाड्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले. कामे करताना प्रत्येकजण घामाने चिंब होताना दिसून आले. पंखे किंवा कुलर लावूनही उकाडा कमी होत नव्हता. उकाड्यापेक्षा उन्ह बरे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. (शहर प्रतिनिधी)