शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

चंद्रपूरच्या पाणीपुरवठयात ५० टक्के कपात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:37 IST

चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने ......

ठळक मुद्देडोकेदुखी वाढणार : इरई धरणात चिंताजनक जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने १ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा ५० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी घेतला. जिल्हाधिकाºयांनी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेतल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी इरई धरणाची पाहणी केली आणि पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षीची पाणीटंचाई सन २०१० पेक्षाही भीषण असण्याची स्थिती दिसत आहे. सुरूवातीलपासूनच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणातील पाणीसाठा २०६.७०० मीटर होता. यावर्षी आजच्या तारखेत २०३.९०० मीटर पाणीसाठा आहे. वीज केंद्रातील सर्व संच नियमित सुरू ठेवले तसेच नियमित पाणीपुरवठा सुरू राहिल्यास आजपासून पुढील केवळ चार महिनेपाणी मिळेल, अशी स्थिती आहे. चंद्रपूर शहराला महिन्याकाठी १ एमएम क्यूब आणि चंद्रपूर वीज केंद्रात प्रत्येक महिन्याला ९ एमएम क्यूब पाण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर शहर आणि वीज केंद्राला दर महिन्याला साधारणत: १० एमएम क्यूब पाण्याची गरज पाहता पाच महिन्यानंतर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. चालू वर्षातील पावसाळ्याचे बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पावसाची अपेक्षा आता सर्वांनीच सोडली आहे.भीषण पाणीटंचाईची स्थिती पाहता जिल्हाधिकाºयांनी गेल्या आठवड्यात पाणीटंचाई संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीतसुध्दा पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा होईल, यासाठी इरई धरणाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्त्रोत नाही. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता अनिल घुमडे, पाणीपुरवठा अभियंता विजय बोरीकर आदींनी गुरूवारी इरई धरणाची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीत पाणीसाठ्याची स्थिती भीषण दिसून आल्याने १ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मनपातील पाणीपुरवठा विभाग तसेच पाणीपुरवठा करणाºया उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान १ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई संदर्भात बैठक होणार असून त्यात जिल्हा प्रशासन सीटीपीएसमधील संच सुरू ठेवण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. या बैठकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासन पाणीटंचाईबाबत नियोजन आरखडा तयार करणार आहे.शहरातील सार्वजनिक विहिरी, हातपंपाची दुरूस्ती करून त्याद्वारे पाण्याचा नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.