शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या पाणीपुरवठयात ५० टक्के कपात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:37 IST

चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने ......

ठळक मुद्देडोकेदुखी वाढणार : इरई धरणात चिंताजनक जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने १ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा ५० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी घेतला. जिल्हाधिकाºयांनी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेतल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी इरई धरणाची पाहणी केली आणि पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षीची पाणीटंचाई सन २०१० पेक्षाही भीषण असण्याची स्थिती दिसत आहे. सुरूवातीलपासूनच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणातील पाणीसाठा २०६.७०० मीटर होता. यावर्षी आजच्या तारखेत २०३.९०० मीटर पाणीसाठा आहे. वीज केंद्रातील सर्व संच नियमित सुरू ठेवले तसेच नियमित पाणीपुरवठा सुरू राहिल्यास आजपासून पुढील केवळ चार महिनेपाणी मिळेल, अशी स्थिती आहे. चंद्रपूर शहराला महिन्याकाठी १ एमएम क्यूब आणि चंद्रपूर वीज केंद्रात प्रत्येक महिन्याला ९ एमएम क्यूब पाण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर शहर आणि वीज केंद्राला दर महिन्याला साधारणत: १० एमएम क्यूब पाण्याची गरज पाहता पाच महिन्यानंतर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. चालू वर्षातील पावसाळ्याचे बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पावसाची अपेक्षा आता सर्वांनीच सोडली आहे.भीषण पाणीटंचाईची स्थिती पाहता जिल्हाधिकाºयांनी गेल्या आठवड्यात पाणीटंचाई संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीतसुध्दा पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा होईल, यासाठी इरई धरणाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्त्रोत नाही. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता अनिल घुमडे, पाणीपुरवठा अभियंता विजय बोरीकर आदींनी गुरूवारी इरई धरणाची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीत पाणीसाठ्याची स्थिती भीषण दिसून आल्याने १ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मनपातील पाणीपुरवठा विभाग तसेच पाणीपुरवठा करणाºया उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान १ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई संदर्भात बैठक होणार असून त्यात जिल्हा प्रशासन सीटीपीएसमधील संच सुरू ठेवण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. या बैठकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासन पाणीटंचाईबाबत नियोजन आरखडा तयार करणार आहे.शहरातील सार्वजनिक विहिरी, हातपंपाची दुरूस्ती करून त्याद्वारे पाण्याचा नवीन स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.