शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:58 IST

हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.

ठळक मुद्देजानेवारीअखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेने २ आॅक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्यात केवळ १७६ कुटुंबांकडेच शौचालय नाही. हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण रँकींग देण्यात येत आहे. यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्याला ६९.११ टक्के गुण मिळाले. केंद्र शासनाने केलेल्या मुल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्हयाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाशिक ७, लातूर ९, अहमदनगर १०, उस्मानाबाद १६, औरंगाबाद ३८, अकोला ४२, परभणी ४५, वाशिम ५०, धुळ ५५, हिंगोली ६०, जळगाव ६३, तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला तीन लाख तीन हजार १३५ वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेला आतापर्यंत ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून लवकरच उर्वरित चार ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त होईल, अशी माहिती स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी दिली.जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले आहे. जिवती तालुक्यातील चार ग्रामपंचायती शिल्लक आहेत. त्या लवकरच गोदरीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या सहकायार्मुळेच चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे.- जितेंद्र पापळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. चंद्रपूर.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान