शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:58 IST

हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.

ठळक मुद्देजानेवारीअखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेने २ आॅक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्यात केवळ १७६ कुटुंबांकडेच शौचालय नाही. हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण रँकींग देण्यात येत आहे. यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्याला ६९.११ टक्के गुण मिळाले. केंद्र शासनाने केलेल्या मुल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्हयाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाशिक ७, लातूर ९, अहमदनगर १०, उस्मानाबाद १६, औरंगाबाद ३८, अकोला ४२, परभणी ४५, वाशिम ५०, धुळ ५५, हिंगोली ६०, जळगाव ६३, तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला तीन लाख तीन हजार १३५ वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेला आतापर्यंत ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून लवकरच उर्वरित चार ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त होईल, अशी माहिती स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी दिली.जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले आहे. जिवती तालुक्यातील चार ग्रामपंचायती शिल्लक आहेत. त्या लवकरच गोदरीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या सहकायार्मुळेच चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे.- जितेंद्र पापळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. चंद्रपूर.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान