शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:58 IST

हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.

ठळक मुद्देजानेवारीअखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेने २ आॅक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्यात केवळ १७६ कुटुंबांकडेच शौचालय नाही. हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी देशभरातील जिल्हयांचे स्वच्छता दर्पण रँकींग देण्यात येत आहे. यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्याला ६९.११ टक्के गुण मिळाले. केंद्र शासनाने केलेल्या मुल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्हयाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाशिक ७, लातूर ९, अहमदनगर १०, उस्मानाबाद १६, औरंगाबाद ३८, अकोला ४२, परभणी ४५, वाशिम ५०, धुळ ५५, हिंगोली ६०, जळगाव ६३, तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला तीन लाख तीन हजार १३५ वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेला आतापर्यंत ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून लवकरच उर्वरित चार ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त होईल, अशी माहिती स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी दिली.जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले आहे. जिवती तालुक्यातील चार ग्रामपंचायती शिल्लक आहेत. त्या लवकरच गोदरीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या सहकायार्मुळेच चंद्रपूर जिल्हा देशात अव्वल ठरला आहे.- जितेंद्र पापळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. चंद्रपूर.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान