शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

चंद्रपूर-वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील शेती धरणात जाणार

By admin | Updated: March 13, 2016 01:10 IST

२३ वर्षांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात दिंदोडा प्रकल्पाकरिता शासनाने जमिनी घेतल्या. या जागेवर धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

वरोरा : २३ वर्षांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात दिंदोडा प्रकल्पाकरिता शासनाने जमिनी घेतल्या. या जागेवर धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढीव मोबदला मिळावा, याकरिता चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष करीत आहे. परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याच्या कुठल्याही हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत नसल्याने वरोरा तालुक्यातील दोन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून येत आहे.१९९३ मध्ये चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील ३३ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदला देऊन दिदोंडा प्रकल्पाकरिता प्रशासनाने घेतल्या. हा मोबदला अत्यल्प असल्याने काही शेतकरी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती करण्यात आल्याची घटना घडली होती. प्रारंभी या जमिनी निप्पान डेन्रो कंपनीने ताब्यात घेतल्या होत्या. त्यावेळी मोबदला दिल्यानंतरही सातबारावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव होते. काही महिन्यापूर्वी प्रशासनाने यानंतर दिदोंडा धरण बांधण्याच्या हालचाली सुरू करीत सातबारावर पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन असे नाव करण्यात आले. यावेळीसुद्धा प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवीत वाढीव मोबदला देण्याची मागणी करीत लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु वाढीव मोबदला मिळाला नाही. आता पुन्हा धरणाच्या कामाला प्रारंभ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. धरणाचे काम सुरू झाल्यास वाढीव मोबदला मिळणार नाही. त्यामुळे १ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरसमोर आत्मदहन करण्याची परवानगी वरोरा तालुक्यातील केळी गावातील प्रकल्पग्रस्त अमोल ठाकरे, धीरेंद्र इंगोले यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. प्रशासनाने आता त्यांचे बयान नोंदविणे सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)