शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

चंद्रपूर-वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील शेती धरणात जाणार

By admin | Updated: March 13, 2016 01:10 IST

२३ वर्षांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात दिंदोडा प्रकल्पाकरिता शासनाने जमिनी घेतल्या. या जागेवर धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

वरोरा : २३ वर्षांपूर्वी अत्यल्प मोबदल्यात दिंदोडा प्रकल्पाकरिता शासनाने जमिनी घेतल्या. या जागेवर धरणाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढीव मोबदला मिळावा, याकरिता चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष करीत आहे. परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याच्या कुठल्याही हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत नसल्याने वरोरा तालुक्यातील दोन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून येत आहे.१९९३ मध्ये चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील ३३ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदला देऊन दिदोंडा प्रकल्पाकरिता प्रशासनाने घेतल्या. हा मोबदला अत्यल्प असल्याने काही शेतकरी न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी कार्यालयाची जप्ती करण्यात आल्याची घटना घडली होती. प्रारंभी या जमिनी निप्पान डेन्रो कंपनीने ताब्यात घेतल्या होत्या. त्यावेळी मोबदला दिल्यानंतरही सातबारावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव होते. काही महिन्यापूर्वी प्रशासनाने यानंतर दिदोंडा धरण बांधण्याच्या हालचाली सुरू करीत सातबारावर पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन असे नाव करण्यात आले. यावेळीसुद्धा प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवीत वाढीव मोबदला देण्याची मागणी करीत लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु वाढीव मोबदला मिळाला नाही. आता पुन्हा धरणाच्या कामाला प्रारंभ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. धरणाचे काम सुरू झाल्यास वाढीव मोबदला मिळणार नाही. त्यामुळे १ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरसमोर आत्मदहन करण्याची परवानगी वरोरा तालुक्यातील केळी गावातील प्रकल्पग्रस्त अमोल ठाकरे, धीरेंद्र इंगोले यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. प्रशासनाने आता त्यांचे बयान नोंदविणे सुरू केले आहे. (तालुका प्रतिनिधी)