शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर

By admin | Updated: November 27, 2014 23:30 IST

महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन

चंद्रपूर : महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रुपये खर्च करून अशिक्षित असणाऱ्यांना साक्षर करण्याचा प्रयत्न करते. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा पूर्णत: साक्षर झाला नसल्याची बाब एका माहितीवरुन समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यापैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर असला तरी टक्केवारी बघता फक्त ८७.५ आहे. साक्षरतेचे सर्वाधिक कमी प्रमाण अतिदुर्गम समजल्या जाणारा जिवती तालुक्यात आहे.जिवती तालुक्यात ७५.५ टक्के लोक साक्षर असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाचे स्वतंत्र कार्यालय असतानासुद्धा चंद्रपूर जिल्हा साक्षरतेमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निरंतर शिक्षणाचे कार्यालय जिल्ह्यात उघडून साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रुपये आतापर्यंत खर्च केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा साक्षरतेने परिपूर्ण व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा संवेदनशिल नसल्याची बाब समोर आली आहे. आजच्या स्थितीत १४ तालुक्यामध्ये वरोरा ८४, चिमूर ७७.४, नागभीड ७६.५, ब्रह्मपुरी ७८, सावली ७०.१, सिंदेवाही ७६.८, भद्रावती ८४.२, चंद्रपूर ८७.५, मूल ७१.८, पोंभूर्णा ७०.५, बल्लारपूरर ८४.४, कोरपना ८१.१, राजुरा ७८.९, गोंडपिंपरी ७२, जिवती ६५.५ एवढी टक्केवारी साक्षरतेची आहे. विशेष म्हणजे, साक्षरतेमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त प्रमाणात आहे. जिवती तालुक्यात ५५.२ टक्के स्त्रिया साक्षर असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात ८६.८ पुरुष साक्षर असून ७३.० स्त्रिया साक्षर आहेत. ग्रामीण भागात ८३.७ टक्के पुरुष तर शहरी भागात ६७.१ टक्के स्त्रिया साक्षर आहेत. शहरी भागात पुरुष ९२.२ टक्के तर ८३.७ स्त्रिया साक्षर आहेत. साक्षरता अभियान अनेक वर्षांपासून राबवूनसुद्धा साक्षरता अभियानाचे फलीत झाले नसल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा शासनाला साक्षरता अभियान राबवावे लागणार असे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)