शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

चंद्रपूरची एसटी सव्वा तीन कोटींनी पंक्चर

By admin | Updated: November 8, 2016 00:59 IST

गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट तोटा : नुकसान कमी करण्यासाठी विविध प्रयत्न

चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागाला गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३ कोटी ३४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या दुप्पट आहे. त्यामध्येही चंद्रपूर मुख्यालयातील आगार सर्वाधिक तोट्यात आहे. तर वरोरा आगाराने नफा कमविला असल्याची माहिती विभागीय नियंत्रक के. एम. सहारे यांनी दिली.चंद्रपूर विभागातर्फे एस.टी. वर्कशॉमध्ये विभागीय नियंत्रक सहारे यांनी पत्रकारांशी संवाद आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, एस. टी.च्या एकूण खर्चापैकी ३५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि ३५ टक्के खर्च बसेसला लागणाऱ्या डिझेलवर होत असतो. उर्वरित ३० टक्क्यामध्ये सर्व काही केले जाते. याशिवाय काही सामाजिक जबाबदाऱ्या म्हणून एस. टी.ला उपक्रम चालवावे लागतात. विविध योजना राबवाव्या लागतात. त्यामुळे हा तोटा होत असतो. तरीही एस. टी.ने खासगी वाहतुकीच्या तुलनेत विश्वसनीयता निर्माण केली आहे. त्या विश्वसनीयतेच्या भरोशावर तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच बसमध्ये लागणारे डिझेल बचत व्हावी, यासाठी बसची गती बांधण्यात आली आहे. बसमधील भारमान वाढावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या वर्षी चंद्रपूर विभागाला एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १ कोटी ५७ लाख रुपये तोटा सहन करावा लागला. याच कालावधीत यावर्षी तो ३ कोटी ३४ लाख रुपयांर गेला आहे. वरोरा वगळता इतर आगार तोट्यात सुरू आहेत. चंद्रपूर मुख्यालय असल्याने तेथे उच्च वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळे या आगाराचा तोटा अधिक दिसतो, अशी पुस्तीही सहारे यांनी जोडली.चंद्रपूर विभागामध्ये चंद्रपूर, राजुरा, चिमूर व वरोरा या चार आगारांचा समावेश आहे. मूल, बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, सिंदेवाही व घुग्घुस येथे अद्यावत बसस्थानके असून १३३ प्रवासी निवारे प्रवाशांच्या सेवेत आहेत. ५५० चालक, ४६० वाहक, ३३६ यांत्रिक अणि २७० प्रशासकीय कर्मचारी ३१५ मार्गांवर सेवा देत आहेत. या विभागासाठी ३०० वाहने उपलब्ध आहेत. दररोज ९० हजार किलोमीटरच्या माध्यमातून सरासरी ८५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत ७७ बसेस चालविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)तोटा कमी करण्यासाठी नवीन उपक्रमएस.टी.चे भारमान वाढावे, यासाठी नवीन उपक्रमाअंतर्गत मार्कंडा, वढा, चैत्र पौर्णिमा, महाकाली यात्रोत्सव, गोदोडा यात्रा आदींकरिता एस.टी. बस सोडण्यात येत आहेत. तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी चंद्रपूर शहराअंतर्गत जादा बसेस सोडण्यात येतात. रामदेगी यात्रोत्सवासाठीही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. ‘झिरो वेटिंग’ फॉर्म्युला आणणारबसस्थानकावर प्रवाशाला बसची वाट पाहावी लागू नये, यासाठी ‘झिरो वेटिंग’ फॉर्म्युला लवकरच लागू करण्यात येणार आहे. अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गावर हा फॉर्म्युला लावण्यात येणार आहे. सिंदेवाही, शिवनी, कारवा या मार्गावर मिनीबस सुरू करण्यात येणार आहे.चार बसस्थानकांचे नूतणीकरणचंद्रपूर विभागातील चार बसस्थानकांचे नूतणीकरण करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या बांधकामासाठी ६ कोटी २५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच बल्लारपूरसाठी १० कोटी, मूल १० कोटी आणि वरोरा बसस्थानकाच्या बांधकामासाठी ७० लाख रुपये प्राप्त झाले. बल्लारपूर आणि मूल येथील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चंद्रपूर येथे नवीन बसस्थानकामध्ये तळमजल्यावर प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे बसस्थानक अद्यावत राहणार आहे.एटीएम व औषधी दुकानांचा प्रस्तावनवीन बसस्थानकाचे बांधकाम करताना प्रवाशांच्या सुविधेसाठी एटीएम मशिन लावण्याचा प्रस्ताव आहे. प्रथमच ही सुविधा बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे. याशिवाय बसस्थानकावर औषधीची दुकाने नाहीत. औषधी दुकानाबाबतही विचार करण्यात येत आहे.