शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

चंद्रपूरची एसटी सव्वा तीन कोटींनी पंक्चर

By admin | Updated: November 8, 2016 00:59 IST

गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट तोटा : नुकसान कमी करण्यासाठी विविध प्रयत्न

चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागाला गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३ कोटी ३४ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. हा तोटा गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या दुप्पट आहे. त्यामध्येही चंद्रपूर मुख्यालयातील आगार सर्वाधिक तोट्यात आहे. तर वरोरा आगाराने नफा कमविला असल्याची माहिती विभागीय नियंत्रक के. एम. सहारे यांनी दिली.चंद्रपूर विभागातर्फे एस.टी. वर्कशॉमध्ये विभागीय नियंत्रक सहारे यांनी पत्रकारांशी संवाद आयोजित केला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, एस. टी.च्या एकूण खर्चापैकी ३५ टक्के खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि ३५ टक्के खर्च बसेसला लागणाऱ्या डिझेलवर होत असतो. उर्वरित ३० टक्क्यामध्ये सर्व काही केले जाते. याशिवाय काही सामाजिक जबाबदाऱ्या म्हणून एस. टी.ला उपक्रम चालवावे लागतात. विविध योजना राबवाव्या लागतात. त्यामुळे हा तोटा होत असतो. तरीही एस. टी.ने खासगी वाहतुकीच्या तुलनेत विश्वसनीयता निर्माण केली आहे. त्या विश्वसनीयतेच्या भरोशावर तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच बसमध्ये लागणारे डिझेल बचत व्हावी, यासाठी बसची गती बांधण्यात आली आहे. बसमधील भारमान वाढावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या वर्षी चंद्रपूर विभागाला एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १ कोटी ५७ लाख रुपये तोटा सहन करावा लागला. याच कालावधीत यावर्षी तो ३ कोटी ३४ लाख रुपयांर गेला आहे. वरोरा वगळता इतर आगार तोट्यात सुरू आहेत. चंद्रपूर मुख्यालय असल्याने तेथे उच्च वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळे या आगाराचा तोटा अधिक दिसतो, अशी पुस्तीही सहारे यांनी जोडली.चंद्रपूर विभागामध्ये चंद्रपूर, राजुरा, चिमूर व वरोरा या चार आगारांचा समावेश आहे. मूल, बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, सिंदेवाही व घुग्घुस येथे अद्यावत बसस्थानके असून १३३ प्रवासी निवारे प्रवाशांच्या सेवेत आहेत. ५५० चालक, ४६० वाहक, ३३६ यांत्रिक अणि २७० प्रशासकीय कर्मचारी ३१५ मार्गांवर सेवा देत आहेत. या विभागासाठी ३०० वाहने उपलब्ध आहेत. दररोज ९० हजार किलोमीटरच्या माध्यमातून सरासरी ८५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत ७७ बसेस चालविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)तोटा कमी करण्यासाठी नवीन उपक्रमएस.टी.चे भारमान वाढावे, यासाठी नवीन उपक्रमाअंतर्गत मार्कंडा, वढा, चैत्र पौर्णिमा, महाकाली यात्रोत्सव, गोदोडा यात्रा आदींकरिता एस.टी. बस सोडण्यात येत आहेत. तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी चंद्रपूर शहराअंतर्गत जादा बसेस सोडण्यात येतात. रामदेगी यात्रोत्सवासाठीही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. ‘झिरो वेटिंग’ फॉर्म्युला आणणारबसस्थानकावर प्रवाशाला बसची वाट पाहावी लागू नये, यासाठी ‘झिरो वेटिंग’ फॉर्म्युला लवकरच लागू करण्यात येणार आहे. अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गावर हा फॉर्म्युला लावण्यात येणार आहे. सिंदेवाही, शिवनी, कारवा या मार्गावर मिनीबस सुरू करण्यात येणार आहे.चार बसस्थानकांचे नूतणीकरणचंद्रपूर विभागातील चार बसस्थानकांचे नूतणीकरण करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या बांधकामासाठी ६ कोटी २५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच बल्लारपूरसाठी १० कोटी, मूल १० कोटी आणि वरोरा बसस्थानकाच्या बांधकामासाठी ७० लाख रुपये प्राप्त झाले. बल्लारपूर आणि मूल येथील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चंद्रपूर येथे नवीन बसस्थानकामध्ये तळमजल्यावर प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. हे बसस्थानक अद्यावत राहणार आहे.एटीएम व औषधी दुकानांचा प्रस्तावनवीन बसस्थानकाचे बांधकाम करताना प्रवाशांच्या सुविधेसाठी एटीएम मशिन लावण्याचा प्रस्ताव आहे. प्रथमच ही सुविधा बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे. याशिवाय बसस्थानकावर औषधीची दुकाने नाहीत. औषधी दुकानाबाबतही विचार करण्यात येत आहे.