शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:22 IST

लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांची नवी ओळख : देशात जाण्यासाठी प्रवाश्यांना झाली सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले. मंत्रिमंडळातील केंद्रीय व राज्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर करवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. अहीर यांची ओळख निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अनेक रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. सुपरफास्ट गाड्यांचे थांबे चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर झाल्याने प्रवाश्यांना देशभरात जाण्याची अडचण दूर झाली. मे २०१४ ते मार्च २०१८ पर्यंत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात ३८ थांब्यांना मंजुरी मिळाली असून रेल्वे गाड्या थांबविल्या जात आहेत.खासदारकीच्या कार्यकाळापासून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. अहीर सतत प्रयत्नशील राहिले. या प्रयत्नामुळे चंद्रपूरच नव्हे तर यवतमाळ आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाही सुविधा उपल्ध झाल्या आहेत. चंद्रपूर व जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट तसेच अन्य रेल्वे गाड्यांचे थांबे नव्हते. त्याठिकाणीही थांबे मंजूर करून रेल्वे प्रवाशांना न्याय दिला आहे. कार्यकाळात अनेक नव्या रेल्वे गाड्या सुरू करून चंद्रपूर, यवतमाळ तसेच गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थी, व्यवसायिक, उद्योजक व नागरिकांना मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. या लोकोपयोगी कार्यामुळे प्रवाश्यांसोबतच रेल्वे सुविधा संघर्ष समिती, रेलयात्री संघटनेने समाधान व्यक्त केले. काझीपेठ ते पुणे ही सुपरफास्ट साप्ताहिक गाडी सुरू करण्यासाठीही ना. अहीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ही गाडी सुरू होऊ शकली. बल्लारपूर, चंद्रपुरातून पुणे शहरात जाण्याची संख्या वाढतच आहे. विशेषत: पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नवी गाडी उपयुक्त ठरली. मात्र, गाडीला डब्बे कमी असल्याने अनेक प्रवाशांना संकटांचा सामना करावा करावा लागत होता. दरम्यान, नुकतीच रेल्वे डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेसलासुद्धा त्यांच्याच प्रयत्नांने वातानुकूलित डब्ब्यांची सुविधा उपलब्ध झाली होती. ना. अहीर चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात अनेक स्थानकांवर रेल्वे थांबा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असून काही थांबे सुरू होणार आहे.