शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:22 IST

लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांची नवी ओळख : देशात जाण्यासाठी प्रवाश्यांना झाली सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक रेल्वे थांबे मंजूर झाल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन प्रस्ताव मंजूर करण्यास ना. हंसराज अहीर यांना यश मिळाले. मंत्रिमंडळातील केंद्रीय व राज्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर करवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. अहीर यांची ओळख निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अनेक रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. सुपरफास्ट गाड्यांचे थांबे चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर झाल्याने प्रवाश्यांना देशभरात जाण्याची अडचण दूर झाली. मे २०१४ ते मार्च २०१८ पर्यंत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात ३८ थांब्यांना मंजुरी मिळाली असून रेल्वे गाड्या थांबविल्या जात आहेत.खासदारकीच्या कार्यकाळापासून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. अहीर सतत प्रयत्नशील राहिले. या प्रयत्नामुळे चंद्रपूरच नव्हे तर यवतमाळ आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाही सुविधा उपल्ध झाल्या आहेत. चंद्रपूर व जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट तसेच अन्य रेल्वे गाड्यांचे थांबे नव्हते. त्याठिकाणीही थांबे मंजूर करून रेल्वे प्रवाशांना न्याय दिला आहे. कार्यकाळात अनेक नव्या रेल्वे गाड्या सुरू करून चंद्रपूर, यवतमाळ तसेच गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थी, व्यवसायिक, उद्योजक व नागरिकांना मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. या लोकोपयोगी कार्यामुळे प्रवाश्यांसोबतच रेल्वे सुविधा संघर्ष समिती, रेलयात्री संघटनेने समाधान व्यक्त केले. काझीपेठ ते पुणे ही सुपरफास्ट साप्ताहिक गाडी सुरू करण्यासाठीही ना. अहीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ही गाडी सुरू होऊ शकली. बल्लारपूर, चंद्रपुरातून पुणे शहरात जाण्याची संख्या वाढतच आहे. विशेषत: पुणे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नवी गाडी उपयुक्त ठरली. मात्र, गाडीला डब्बे कमी असल्याने अनेक प्रवाशांना संकटांचा सामना करावा करावा लागत होता. दरम्यान, नुकतीच रेल्वे डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सेवाग्राम एक्स्प्रेसलासुद्धा त्यांच्याच प्रयत्नांने वातानुकूलित डब्ब्यांची सुविधा उपलब्ध झाली होती. ना. अहीर चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात अनेक स्थानकांवर रेल्वे थांबा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असून काही थांबे सुरू होणार आहे.