शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शहिदांच्या सन्मानासाठी बंद राहिले चंद्रपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:38 IST

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील संपूर्ण दुकाने कडकडीत बंद होती.

ठळक मुद्देउत्स्फूर्त आणि कडकडीत३० व्यापारी संघटनांचा सहभागपाकिस्तानविरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांच्या सन्मानार्थ व घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या चंद्रपूर बंदला सोमवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील संपूर्ण दुकाने कडकडीत बंद होती.यात शहरातील ३० व्यापारी संघटनांचा सहभाग होता. बंददरम्यान व्यापाºयांनी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविले.पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर चेंबर आॅफ कॉमर्सने एक तातडीची बैठक घेतली. यात कॅन्डल मार्च काढणे, व्यापारपेठ बंद ठेवणे व निधी गोळा करून शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यानुसार रविवारी सायंकाळी ६ वाजता सर्व व्यापारी गांधी चौकात एकत्रित आले.त्यानंतर तिथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. हा कॅन्डल मार्च जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आला व तिथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये शहरातील शेकडो नागरिकही सहभागी झाले होते.त्यानंतर सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळपासूनच एक-दोन किरकोळ दुकानांचा अपवाद वगळता चंद्रपुरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बंगाली कॅम्प, गिरनार चौक, गांधी चौक, रामनगर, बाबुपेठ, बागला चौक, पठाणपुरा आदी परिसरातील बाजारपेठा बंद होत्या. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद यशस्वी करीत शहिदांना श्रध्दांजली अर्पित केली. यावेळी नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने उपस्थिती दर्शविली.बाईक रॅलीसकाळपासून व्यापारपेठ बंद ठेवल्यानंतर व्यापाऱ्यांनी गांधी चौकातून बाईक रॅली काढली. गांधी चौक ते जयंत टॉकीज चौक, जटपुरा गेट व जिल्हाधिकारी कार्यालय अशी ही बाईक रॅली फिरली. दरम्यान, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन पाठविण्यात आले. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज, रामजीवन परमार, सुमेध कोतपल्लीवार, दिनेश बजाज, अविनाश बुक्कावार, विवेक पत्तीवार, चंद्रकांत उमाटे, रितेश वर्मा, सुनील शुक्ला, चिंटू पुगलिया आदी उपस्थित होते.बाजारपेठेत शुकशुकाटया बंददरम्यान, मुख्य रस्त्यावरील दुकानांसह गल्लीबोळातील लहान-सहान दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. चहा टपरी, पान टपऱ्यादेखील बंद होत्या. एरवी चंद्रपुरातील गंजवॉर्ड, गोकूल गल्ली, गोलबाजार, गांधी चौक या ठिकाणी बाजारपेठत रेलचेल असते. मात्र सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असतानाही बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.नागभीडमध्ये कडकडीत बंदनागभीड : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा नागभीड येथे कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. नागभीड येथील सर्व राजकीय पक्ष, संस्था एकत्रित आले. व्यापाºयांनीही आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नगर परिषदेच्या ओट्यापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत सर्वच विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.