शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

‘स्वच्छता अ‍ॅप’मध्ये चंद्रपूरने राज्यात मारली पहिल्या क्रमांकावर बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 11:14 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच शिवाय देशातही १७० व्या क्रमांकावरुन थेट २८ व्या स्थानी उडी घेतली आहे.

ठळक मुद्देदेशात २८ वा क्रमांकअ‍ॅपवरच नोंदविता येथे स्वच्छतेबाबत तक्रार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्यात चंद्रपूर शहराने राज्यात प्रथम स्थान तर पटकावले आहेच शिवाय देशातही १७० व्या क्रमांकावरुन थेट २८ व्या स्थानी उडी घेतली आहे. चंद्रपूर शहरातील जवळपास ५ हजार ८३४ मोबाईलधारकांनी ‘स्वच्छता अ‍ॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.२ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात केली. स्वच्छता मोहिमेत केवळ सरकारी कर्मचाऱ्यांवर भर न देता समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांनी भर द्यावा, यासाठी जनजागृती करण्यात आली.स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्या, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छता अ‍ॅपची सुरुवात करण्यात आली. यात देशभरातील विविध शहरे आपला सहभाग नोंदवितात. सहभागी शहरांच्या स्वच्छतेविषयक कामगिरीचे क्वालिटि कौन्सिल आॅफ इंडिया या संस्थेद्वारे सर्वेक्षण केले जाते. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत देशभरातील ४ हजार ४१ शहरे सहभागी आहेत. स्वच्छता गुणवत्तेविषयक विविध निकष सहभागी शहरांना पार पाडायचे आहेत.यातीलच एक म्हणजे, शहरातील किती लोकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले, किती लोकांनी कचऱ्यासंबंधी तक्रारी नोंदविल्या, त्या किती वेळेत सोडविण्यात आल्या व तक्रारी निवारणाबाबत नागरिकांचा अभिप्राय काय, हे सर्व स्वच्छता अ‍ॅपवर दिसत असते. सामान्य नागरिकांना आपला परिसर व पर्यायाने शहर स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वच्छता अ‍ॅपवर तक्रार करणे.शहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिक तक्रार करू शकतात. या कचºयाचा फोटो काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास महानगरपालिकेद्वारे १२ तासांच्या आत त्यावर कार्यवाही करण्यात येते. तक्रार निवारण केल्यावर त्यावर अभिप्राय नोंदविणे गरजेचे आहे. या तक्रारींचे निवारण योग्यरित्या झाले नसल्यास नागरिक नकारात्मक अभिप्राय नोंदवू शकतात किंवा पुन्हा ती तक्रार उघडू शकतात. जेणेकरुन त्या तक्रारींचे पूर्णत: निवारण करणे महानगरपालिकेला आवश्यक आहे.सुमारे १० हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेचे ध्येय आहे. आयुक्त संजय काकडे यांच्या निर्देशानुसार मनपाचा स्वच्छता विभाग यासाठी सतत कार्यरत आहे. सुमारे २०० अ‍ॅप्स रोज डाऊनलोड केले जात असून यात दररोज सुमारे ४०० तक्रारी व त्यांचे निवारण तसेच ३०० पेक्षा जास्त अभिप्राय नागरिक नोंदवित आहेत. या एक महिन्याच्या कालावधीत पाच हजार ८३४ अ‍ॅप नागरिकांनी डाऊनलोड केलेल्या आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान