शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

२०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूरचे खेळाडू होणार सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशाचा झेंडा फडकावून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या ‘मिशन शक्ती’चा शुभारंभ येत्या ४ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे होऊ घातला आहे.

ठळक मुद्दे४ ऑगस्ट रोजी आमिर खान करणार मिशन शक्तीचा भव्य शुभारंभ

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशाचा झेंडा फडकावून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या विद्यार्थ्यांची जिद्द पाहुनराज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अपेक्षांना नवे बळ आले. त्यांनी देशाच्या प्रत्येक क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याने नेतृत्व करावे, असा निर्धारच त्यांनी केला. हे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी एक ‘मिशन’च हाती घेतले. त्याचाच एक भाग ‘मिशन शक्ती’चा शुभारंभ येत्या ४ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे होऊ घातला आहे. या शुभारंभाकडे सर्व युवाशक्तीचे लक्ष लागलेले आहेत.मिशन शक्तीच्या माध्यमातून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी २०२४ चे ऑलम्पिक डोळ्यासमोर ठेवले आहेत. गेल्या ११९ वर्षांमध्ये अमेरिकेने ऑलंम्पिकमध्ये तब्बल २ हजार ५२० पदके जिंकली. तर भारताने केवळ २८ पदके जिंकली आहेत. आपल्या देशात सोई-सुविधांचा अभाव असल्यामुळे खेळांडूना ऑलम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करता येत नाही. ही उणीव भरून काढण्याचे स्वप्न ना. मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीच्या माध्यमातून बघितले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दहापैकी सात विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर आता ना. मुनगंटीवार यांनी २०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडंूना पूर्ण ताकदीनिशी तयार करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, राजकारण करीत असताना त्यांनी जो निर्धार केला तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केला आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्याच अनुषंगाने मिशन शक्तीचा शुभारंभ अवघ्या वर्षभरात करण्यात येत आहे. याप्रसंगाचे साक्षदार होण्याचे निमंत्रण ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीच दि.२१ ऑगस्ट २०१८ रोजी आमिर खान यांना दिले होते. दरम्यान, आमिर खान यांनीही ताडोबा, चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंपदा, खाणींबाबत जाणून घेताना आपली त्याबाबतची आपली रुची दाखविली होती. तसेच त्यांनी हे निमंत्रण स्वीकारत पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली होती. हा क्षण आता अवघ्या काही दिवसांवर आहे. या कार्यक्रमात माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आमिर खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.काय आहे सुधीर मुनगंटीवारांचे ‘मिशन’चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न बाळगतानाच त्यांनी एक मिशनही आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहे. आणि ते मिशन पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचालही सुरू केली. त्यांचे पहिले मिशन होते ‘मिशन शौर्य’. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी मुला-मुलींना माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज करून पाठविले. आणि या विद्यार्थ्यांनी ते सर करून चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. दुसरे - ‘मिशन सेवा’ या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून देशातील उच्च पदे काबीज करावी. यासाठी त्यांनी जिल्ह्यात सर्वत्र अत्याधुनिक व सुसज्ज अशी वाचनालये उपलब्ध करून दिली आहेत. दररोज हजारो विद्यार्थी करताना दिसून येते. तिसरे - मिशन शौर्य भारतीय सैन्य दलात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या पदावर असावेत. यासाठी त्यांनी देशात पहिल्या क्रमांकाची अत्याधुनिक सोर्इंनीयुक्त अशी देखणी सैनिकी शाळा चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर अवघ्या वर्षभरात उभी केली. ना. मुनगंटीवार यांचे चवथे मिशन आहे ‘मिशन शक्ती’. मिशन शक्तीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूने जागतिक पातळीवर जावून देशासाठी पदके आणावी. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात व जगात मोठ्या आदराने घेतले जाईल. यासाठी त्यांनी बल्लारपूर येथे सर्वसार्इंनी युक्त अशा क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. त्याचा शुभारंभ ४ ऑगस्टला होऊ घातला आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार