शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

चंद्रपूर मनपाचे नागरी आरोग्य केंद्र औषधांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:02 IST

शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, खरेदीला वेळ लागत असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मनपाच आता औषधी खरेदी करणार असून याकरिता किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : सात महिन्यांपासून औषध खरेदीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, खरेदीला वेळ लागत असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मनपाच आता औषधी खरेदी करणार असून याकरिता किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर शहरामध्ये सात नागरी आरोग्य केंद्र आहेत. मनपा प्रशासनातर्फे ही आरोग्य केंद्रे चालविली जातात. इंदिरानगर, टिबी हॉस्पीटल रामनगर, बालाजी वॉर्ड गोपालपुरी, बगड खिडकी भानापेठ वॉर्ड, भिवापूर सुपर मार्केट आणि तुकूम येथे मागील अनेक वर्षांपासून नागरी आरोग्य केंद्रामार्फत रूग्णांना सेवा दिल्या जात आहे. सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे जलजन्य आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत.उपचारासाठी नागरी आरोग्य केंद्रात गेल्यास उपचारानंतर बाहेरून औषधी विकत घेण्याचे सांगितल्या जाते. हा प्रकार मागील सात महिण्यांपासून सुरू आहे.मनपा प्रशासनाने या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र मागील दोन वर्षांपासून औषधे खरेदी न केल्याची माहिती पत्राद्वारे मनपा प्रशासनाला कळविण्यात आली. परिणामी, रूग्णांची अडचण लक्षात घेऊन मनपालाच यातून तोडगा काढल्याशिवाय पर्याय उरला नाही. नागरी केंद्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील रूग्ण उपचारसाठी येतात. त्यामुळे बाहेरून औषधी खरेदी करताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, अशी खंत रूग्णांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. याकडे शासनाने त्वरीत लक्ष द्यावे.चंद्रपुरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा नाही, याची जाणीव प्रशासनाला आहे. याबाबत तातडीने मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या एक आठवड्यात मनपा स्वत: औषधे खरेदी करणार आहे.- डॉ. अंजली आंबटकरवैद्यकीय विभाग प्रमुखमनपा, चंद्रपूर