शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

चंद्रपूर मनपाचे नागरी आरोग्य केंद्र औषधांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:02 IST

शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, खरेदीला वेळ लागत असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मनपाच आता औषधी खरेदी करणार असून याकरिता किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष : सात महिन्यांपासून औषध खरेदीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. परंतु, खरेदीला वेळ लागत असल्याचे उत्तर देत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी मनपाच आता औषधी खरेदी करणार असून याकरिता किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर शहरामध्ये सात नागरी आरोग्य केंद्र आहेत. मनपा प्रशासनातर्फे ही आरोग्य केंद्रे चालविली जातात. इंदिरानगर, टिबी हॉस्पीटल रामनगर, बालाजी वॉर्ड गोपालपुरी, बगड खिडकी भानापेठ वॉर्ड, भिवापूर सुपर मार्केट आणि तुकूम येथे मागील अनेक वर्षांपासून नागरी आरोग्य केंद्रामार्फत रूग्णांना सेवा दिल्या जात आहे. सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे जलजन्य आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत.उपचारासाठी नागरी आरोग्य केंद्रात गेल्यास उपचारानंतर बाहेरून औषधी विकत घेण्याचे सांगितल्या जाते. हा प्रकार मागील सात महिण्यांपासून सुरू आहे.मनपा प्रशासनाने या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र मागील दोन वर्षांपासून औषधे खरेदी न केल्याची माहिती पत्राद्वारे मनपा प्रशासनाला कळविण्यात आली. परिणामी, रूग्णांची अडचण लक्षात घेऊन मनपालाच यातून तोडगा काढल्याशिवाय पर्याय उरला नाही. नागरी केंद्रामध्ये प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील रूग्ण उपचारसाठी येतात. त्यामुळे बाहेरून औषधी खरेदी करताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, अशी खंत रूग्णांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. याकडे शासनाने त्वरीत लक्ष द्यावे.चंद्रपुरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा नाही, याची जाणीव प्रशासनाला आहे. याबाबत तातडीने मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या एक आठवड्यात मनपा स्वत: औषधे खरेदी करणार आहे.- डॉ. अंजली आंबटकरवैद्यकीय विभाग प्रमुखमनपा, चंद्रपूर