शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

चंद्रपूर मनपालाही निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:31 IST

जिल्हा परिषदेच्या आणि राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला.

निवडणूक कधी ? : चंद्रपूरकरांना पडलायं प्रश्नचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या आणि राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. मात्र या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने ‘चंद्रपूर मनपाच्या निवणुका केव्हा ?’, असा प्रश्न विचारताना बुधवारी दिवसभर अनेकजण दिसून आले.राज्यातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी जाहीर होताच एकच पळापळ सुरु झाली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या यादीत चंद्रपूर शहराचेही नाव असेल, असा कयास होता. मात्र या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. चंद्रपूर महानगर पालिकेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे निवडणुका जिल्हा परिषदेनंतर येतील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमात एप्रिल मजिहन्यात मुदत संपणाऱ्या उल्हासनगर महानगर पालिकेसह अन्य ठिकाणच्याही निवडणुका जाहीर केल्याने चंद्रपूरकर संभ्रमात पडलेले दिसले. अनेकांना काहीतरी चुकल्यासारखे वाटल्याने अधिकारी आणि माध्यमांच्या कार्यालयात संपर्क साधून शहानिशा करण्याचा प्रयत्नही अनेक नागरिकांनी केला. या संदसर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्याशी संपर्क साधला असता दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमावली उशिरा आल्याने निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया आता सुरू आहे. डिसेंबर-२०१६ अखेर प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर ९ जानेवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून त्यावरील सुनावणी २५ जानेवारीला होणार अहे. त्यानंतर अंतीम प्रभाग रचना १५ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. निवडणुकीपूर्वी मतदार याद्या तयार असणे आवश्यक असते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेतील मतदार याद्यांवरील आक्षेपांची कार्यवाही बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू असून अंतीम यादी महिनाभरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. निवडणूकपूर्व प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. यामुळे निवडणुका आताच होणार नाहीत याचा अंदाज आलेले अधिकारी आणि राजकीय मंडळी सध्यतरी निवांत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)२६ नोव्हेंबर २०११ ला झाली होती चंद्रपूर मनपाची स्थापनामुळातच चंद्रपूर महानगर पालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. २६ नोव्हेंबर २०११ रोजी या महानगर पालिकेची स्थापना झाली होती. त्यानंतर पहिली निवडणूक एप्रिल-२०१६ मध्ये पार पडली. नगरसेवकांच्या निवडणुकीनंतर मे-२०११ मध्ये महापौरपदाची निवडणूक झाली. महापौरपदाचा कार्यकाळ मे-२०११ पासून सुरु झाल्याने तो मे-२०१७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे या निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात होतील, असा सर्वांचा अंदाज आहे.नव्याने अस्तित्वात आल्या होत्या तीन महानगर पालिकाराज्यातील तीन महानगर पालिका २०११ मध्ये नव्याने अस्तित्वात आल्या होत्या. त्यात, चंद्रपूरसह लातूर आणि परभणीचा समावेश होता. त्यापूर्वीही भार्इंदर येथे महानगर पालिका अस्तित्वात आली होती. या सर्वच ठिकाणी या टप्प्यात निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला नाही. दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता आहे.