शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मनपालाही निवडणुकीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:31 IST

जिल्हा परिषदेच्या आणि राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला.

निवडणूक कधी ? : चंद्रपूरकरांना पडलायं प्रश्नचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या आणि राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. मात्र या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने ‘चंद्रपूर मनपाच्या निवणुका केव्हा ?’, असा प्रश्न विचारताना बुधवारी दिवसभर अनेकजण दिसून आले.राज्यातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारी जाहीर होताच एकच पळापळ सुरु झाली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या यादीत चंद्रपूर शहराचेही नाव असेल, असा कयास होता. मात्र या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. चंद्रपूर महानगर पालिकेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. त्यामुळे निवडणुका जिल्हा परिषदेनंतर येतील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमात एप्रिल मजिहन्यात मुदत संपणाऱ्या उल्हासनगर महानगर पालिकेसह अन्य ठिकाणच्याही निवडणुका जाहीर केल्याने चंद्रपूरकर संभ्रमात पडलेले दिसले. अनेकांना काहीतरी चुकल्यासारखे वाटल्याने अधिकारी आणि माध्यमांच्या कार्यालयात संपर्क साधून शहानिशा करण्याचा प्रयत्नही अनेक नागरिकांनी केला. या संदसर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्याशी संपर्क साधला असता दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमावली उशिरा आल्याने निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया आता सुरू आहे. डिसेंबर-२०१६ अखेर प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर ९ जानेवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून त्यावरील सुनावणी २५ जानेवारीला होणार अहे. त्यानंतर अंतीम प्रभाग रचना १५ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. निवडणुकीपूर्वी मतदार याद्या तयार असणे आवश्यक असते. मात्र चंद्रपूर महानगर पालिकेतील मतदार याद्यांवरील आक्षेपांची कार्यवाही बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू असून अंतीम यादी महिनाभरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. निवडणूकपूर्व प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. यामुळे निवडणुका आताच होणार नाहीत याचा अंदाज आलेले अधिकारी आणि राजकीय मंडळी सध्यतरी निवांत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)२६ नोव्हेंबर २०११ ला झाली होती चंद्रपूर मनपाची स्थापनामुळातच चंद्रपूर महानगर पालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. २६ नोव्हेंबर २०११ रोजी या महानगर पालिकेची स्थापना झाली होती. त्यानंतर पहिली निवडणूक एप्रिल-२०१६ मध्ये पार पडली. नगरसेवकांच्या निवडणुकीनंतर मे-२०११ मध्ये महापौरपदाची निवडणूक झाली. महापौरपदाचा कार्यकाळ मे-२०११ पासून सुरु झाल्याने तो मे-२०१७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे या निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात होतील, असा सर्वांचा अंदाज आहे.नव्याने अस्तित्वात आल्या होत्या तीन महानगर पालिकाराज्यातील तीन महानगर पालिका २०११ मध्ये नव्याने अस्तित्वात आल्या होत्या. त्यात, चंद्रपूरसह लातूर आणि परभणीचा समावेश होता. त्यापूर्वीही भार्इंदर येथे महानगर पालिका अस्तित्वात आली होती. या सर्वच ठिकाणी या टप्प्यात निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला नाही. दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता आहे.