शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

लोकपूर ते चंद्रपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:26 IST

चंद्रपूर जिल्हा हा गोंडराजवट, भोसले व ब्रिटीशांच्या काळात ‘चांदा’ नावाने ओळखल्या जात होता. त्यापूर्वी ‘लोकपूर’ म्हणून या ऐतिहासिक शहराची नोंद इतिहासात आहे. कालांतराने चंद्रपूर हे नाव मिळाले.

चंद्रपूर जिल्हा हा गोंडराजवट, भोसले व ब्रिटीशांच्या काळात ‘चांदा’ नावाने ओळखल्या जात होता. त्यापूर्वी ‘लोकपूर’ म्हणून या ऐतिहासिक शहराची नोंद इतिहासात आहे. कालांतराने चंद्रपूर हे नाव मिळाले. लोकपूर ते चंद्रपूर या वाटचालीत भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रात बदल होत गेले. ब्रिटीश कालावधीत चांदा म्हणूनच नोंद आहे. १९६४ रोजी हे नाव बदलून चंद्र्रपूर झाले. काळानुसार प्रशासकीय संरचनेत बदल करण्याची गरज निर्माण झाली. या भागात इतर धार्मिक स्थळांसोबत वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश होतो. हिंदू आणि बुद्धिस्ट राजांनीही या क्षेत्रावर बराच काळ राज्य केल्याचे इतिहासाच्या पानातून दिसून येते.गोंडराजांनी ९ व्या शतकाच्या सुमारास आणि १७५१ नंतर नागपूरकर भोसल्यांनी या भागावर दीर्घकाळ राज्य केले. अखेरचा राजवंशी राजा रघुशी भोसले यांचा मृत्यू १८५३ रोजी झाला. भोसल्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतला. दरम्यान, ब्रिटीशांनी नागपूर व चंद्र्रपूरला एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले. स्वातंत्र्यानंतर चंद्र्रपूर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. त्यावेळी केवळ तीन तहसील होत्या. मूल, वरोरा व ब्रह्मपुरी शहरांचा त्यामध्ये समाविष्ठ करण्यात आला. हे चार तहसील चंद्र्रपूरला जोडण्यात आले. मुख्यालय म्हणून सिरोंचा हा तहसील ठेवण्यात आला होता. १९८५ रोजी एका तहसील मुख्यालयाचे मूल येथून चंद्रपूरला हस्तांतरण झाले. १९०५ रोजी नवीन तहसील मुख्यालयासह गडचिरोली येथे ब्रह्मपुरी व चंद्रपूर तहसीलपासून जमीनदारी मालमत्तेसह हस्तांतरित करण्यात आले. चंद्रपुरातील जमीनदारीचा लहान हिस्सा नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्याला १९०७ रोजी हस्तांतरित झाला. त्याच वर्षी क्षेत्र १ हजार ५६० चौ. कि. मी. तिन्ही विभाग मद्रास राज्यात हस्तांतरित करण्यात आले होते. यामध्ये अधिक बदल न करता १९११-१९५५ च्या काळात जिल्हा अथवा तहसीलच्या सीमांमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या. १९५६ रोजी भाषावार प्रांत योजनेचा परिणाम म्हणून हा जिल्हा मध्य प्रदेश राज्यातून बॉम्बे राज्याला हस्तांतरीत करण्यात आला. त्याच कालावधीत हैद्राबाद राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याचा भाग राजुरा तहसील नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात १९५९ रोजी हस्तांतरीत करण्यात आला. मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. १९८१ च्या जनगणनेनंतर चंद्रपुरातून गडचिरोली वेगळा झाला. जिल्ह्यात आता चंद्र्रपूर, मूल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोंभुर्णा, राजुरा, कोरपना, बल्लारपूर व जिवती आदी सात तालुके आहेत.