शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

चंद्रपूरसह मुंबई, पुणे, नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:13 IST

बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत.

ठळक मुद्दे५० हजार राख्यांचे उद्दिष्ट : रक्षाबंधनाला चंद्रपूर बीआरटीसीची अनोखी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहीण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहीण आधीच राखीचा बेत बांधून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) कडून आगळीवेगळी भेट ठरणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू उत्पादन होते. बांबूवर आधारित उद्योग असावा. त्यापासून जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील विविध भागात नव्या रोजगाराची निर्मिती व्हावी, या उद्दात्त हेतूने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. बांबूपासून घराच्या दिवाणखाण्यापासून तर कार्यालयात शोभून दिसेल अशा वस्तूंची निर्मिती सुरू झाली.या केंद्राने एक पाऊल पुढे टाकत यावर्षीपासून बांबूपासून चक्क राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आणि बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कामही सुरू आहे.मुंबई, पुणे व नागपुरातून मागणीबांबूपासून राखी निर्मितीची कल्पनाच नाविण्यपूर्ण होती. ही कल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आवडली. या राख्यांना राज्यात मोठी मागणी आहे. पहिले वर्ष असल्यामुळे चंद्रपूर, मुंबई, पुणे व नागपूर या महानगरात या राख्या पाठविण्यात येणार असल्याचे बांबू रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग सेंटरचे संचालक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वनमंत्र्यांच्या हस्ते राखी लोकार्पणराज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मंगळवारी बल्लारपूर नगर परिषदेतील कार्यक्रमात राखी लोकार्पण समारंभ पार पडला. बचतगटातील महिलांनी ना. मुनगंटीवार यांच्या हस्तकमलावर राखी बांधली. बचत गटातील भगिनींनी बनवलेली राखी खरेदी करावी. पर्यावरणपूरक राखी रक्षाबंधनात वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार संजय धोटे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, मीना चौधरी, उपविभागीय आधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी श्री.विपिन मुदधा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय आधिकारी नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार