शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

वृक्ष लागवडीत चंद्रपूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:25 IST

राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या मोहीमेत चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ६९ लाख ८४ हजार ४२१ इतकी विक्रमी वृक्ष लागवड झाल्याची नोंद झाली.

ठळक मुद्दे६९ लाख ८४ हजार ४२१ वृक्ष लागवड नांदेड पहिल्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या मोहीमेत त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ६९ लाख ८४ हजार ४२१ इतकी विक्रमी वृक्ष लागवड झाल्याची नोंद झाली. ही नोंद राज्यात तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे.राज्याचे वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी गेल्या तीन वषार्पासून वृक्षलागवडीचा विक्रम राज्यात केला आहे. पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी तर तिसऱ्या वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे आवाहन त्यांनी केले होते. या मोहिमेला यावर्षी सर्वाधिक प्रतिसाद नांदेड जिल्ह्याने दिला आहे. त्या पाठोपाठ मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याचा क्रमांक येतो. ३१ दिवसांमध्ये सर्वाधिक वृक्षलागवडीची नोंद ५ जुलैला करण्यात आली. जिल्हयात या दिवशी ४ लाख ८९ हजार १०२ वृक्षलागवड झाली होती.राज्यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, चार दिवस आधीच ही वृक्षलागवड १३ कोटींच्यावर गेली. राज्यामध्ये दुपारी ४ वाजतापर्यंत १४ कोटी ७१ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आल्याचे जाहिर केले. यामध्ये चंद्रपूरचा देखील मोठा हातभार असल्याचे समाधान जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले असून सहभागी सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त मानले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विभागवार वृक्ष लागवड३१ दिवसात वनविभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार वनविभागाने ३१ जुलैपर्यंत ३१ लाख १० हजार ३७५ वृक्षलागवड केली आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने १४ लाख ५१ हजार ३८ वृक्षलागवड केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत ९ लाख ८५ हजार वृक्षलागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३ लाख ६६ हजार ३२४ वृक्ष लावले आहे. शैक्षणिक संस्थांनी १ लाख ४२ हजार, कृषी विभागाने २ लाख ४९ हजार वृक्षलागवड केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख १४ हजार, नगर विकास विभागाने १ लाख २१ हजार वृक्षलागवड करुन उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार