शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हा होणार हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 01:26 IST

संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या महान संतांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

बबनराव लोणीकर : जिल्हा परिषदेची स्वच्छतेवर कार्यशाळाचंद्रपूर : संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या महान संतांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनचा नारा दिला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हा हागणदारी मुक्त करुन या मिशनची सुरुवात करण्यात येईल, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छता कार्यशाळेत ते बोलत होते. बुधवारी येथे पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत त्यांनी आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, राजेश राठोड व युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे उपस्थित होते.माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र या नुसार ५५० गावात सभा घेतल्या असून लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केल्याचे ना.लोणीकर यांनी सांगितले. महिलाच हे अभियान यशस्वी करु शकतात, असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हा स्वच्छ करण्याची व हागणदारीमुक्त करण्याची मोठी जबाबदारी महिला वर्गावर आहे. चंद्रपूर जिल्हा राज्यात पायलट जिल्हा म्हणून हागणदारी मुक्त करण्यात येणार असून यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी हात धुवाविषयी प्रात्यक्षिक करुन दाखविले. (स्थानिक प्रतिनिधी)