शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हा होणार हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 01:26 IST

संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या महान संतांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

बबनराव लोणीकर : जिल्हा परिषदेची स्वच्छतेवर कार्यशाळाचंद्रपूर : संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या महान संतांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनचा नारा दिला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हा हागणदारी मुक्त करुन या मिशनची सुरुवात करण्यात येईल, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छता कार्यशाळेत ते बोलत होते. बुधवारी येथे पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत त्यांनी आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, राजेश राठोड व युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे उपस्थित होते.माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र या नुसार ५५० गावात सभा घेतल्या असून लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केल्याचे ना.लोणीकर यांनी सांगितले. महिलाच हे अभियान यशस्वी करु शकतात, असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हा स्वच्छ करण्याची व हागणदारीमुक्त करण्याची मोठी जबाबदारी महिला वर्गावर आहे. चंद्रपूर जिल्हा राज्यात पायलट जिल्हा म्हणून हागणदारी मुक्त करण्यात येणार असून यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी हात धुवाविषयी प्रात्यक्षिक करुन दाखविले. (स्थानिक प्रतिनिधी)