शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

चंद्रपूर जात पडताळणी समिती अध्यक्षांकडे चार जिल्ह्यांची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST

चंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडेसुद्धा ...

चंद्रपूर : चंद्रपुरातील जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडेसुद्धा चंद्रपूर व गडचिरोली समाजकल्याण विभागाचा प्रभार असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे जात पडताडणीची सुमारे चार हजार प्रकरणे प्रलंबित आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रणासाठी कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागत आहेत.

व्यावसायिक शिक्षण, नोकरी व निवडणूक आदी कामांसाठी अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती- जमाती, अशा पाच प्रवर्गांमध्ये येणाऱ्यांची जात पडताळणी करण्यात येते. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर जात पडताळणी समितीकडे ठेवण्यात येते. या समितीमध्ये अध्यक्ष, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, उपायुक्त तथा सदस्यांचा समावेश असतो.

चंद्रपूर जात प्रमाणपत्र समितीचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष इटकारे यांची बदली झाल्यानंतर विनय मून यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे गडचिरोली, अमरावती व नागपूर जिल्ह्यांचा कारभार देण्यात आला होता. मात्र, विनय मून यांची बदली झाल्यानंतर संजय दैने यांच्याकडे चंद्रपूर जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा कारभार देण्यात आला, तर संशोधन अधिकारी अमोल यावलीवर, तर उपायुक्त व्ही.जे. वाकूडकर कार्यरत आहेत. पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने यांच्याकडे सद्य:स्थितीत चंद्रपूरसह गोंदिया, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांचा पदभार देण्यात आला आहे, तर समितीतील संशोधन अधिकारी अमोल यावलीकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून सहायक आयुक्त समाजकल्याण चंद्रपूर व गडचिरोलीचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरसुद्धा कामाचा मोठा भार आहे. प्रमाणपत्राची सुनावणी समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होते. मात्र, एकाच व्यक्तीजवळ चार जिल्ह्याचा प्रभार असल्याने काम करण्यात त्यांची मोठी दमछाक होत आहे. परिणामी, चार हजार प्रकरणे प्रलंबित असून, विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागतात.

बॉक्स

कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

पूर्वी जात पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन राबविण्यात यायची. मात्र, कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापासून अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आदी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा त्यांची ऑफलाइन कागदपत्रे पडताळणी करावी लागते. एकाच प्रमाणपत्रासाठी दोन-दोनदा प्रक्रिया करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे.

बॉक्स

१५ दिवसांत प्रकरण निकाली

जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे प्रकरण सादर झाल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. संपूर्ण कागदपत्रे पूर्ण असल्यास १५ दिवसांत जात पडताळणी प्रमाणपत्र मिळते. जर कागदपत्रांत त्रुटी असल्यास सुनावणीसाठी बोलवून कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यानंतर पुन्हा त्या कागदपत्रांची तपासणी करून प्रकरण निकाली काढण्यात येते.

कोट

कागदपत्रे पूर्ण असलेल्या व्यावसायिक शिक्षणातील विद्यार्थ्यांची प्रकरणे निकाली निघाली आहेत, तर बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू होईपर्यंत त्यांचीही प्रकरणे निकाली काढण्यात येतील. यासोबतच निवडणूक उमेदवारांचीही प्रमाणपत्रे मे महिन्यापर्यंत काढण्यात येणार आहेत. मनुष्यबळ पुरेसे असून, कामही नियमित आणि सुव्यवस्थित सुरू आहे.

-विजय वाकूडकर,

उपायुक्त समाजकल्याण, चंद्रपूर