शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी चंद्रपुरात २४ हजार ६६८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:54 IST

शहराची व्याप्ती दरवर्षी वाढत असताना घरांचा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला़ वाढती महागाई आणि जमिनीच्या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे तर हाल सुरू आहेत़.....

ठळक मुद्देआर्थिक झळ सोसून भरले अर्ज : हजारो नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची व्याप्ती दरवर्षी वाढत असताना घरांचा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला़ वाढती महागाई आणि जमिनीच्या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे तर हाल सुरू आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वांसाठी घरे २०१२ याचा लाभ घेण्यासाठी शहरातील २४ हजार ६६८ नागरिकांनी महानगरपालिकडे अर्ज सादर केले़ या अर्जांची छाणनी करून पात्र नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेची मोठी दमछाक होणार आहे़सर्वसामान्य नागरिकांना शहरात घर बांधणे आज अशक्य बाब आहे. कुटुंबाचा प्रपंच भागविताना हक्काचे घरकुल उभारणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जागा विकत घेवून घर बांधणे सर्वसामान्य नागरिकांना कदापि शक्य नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) लाभ घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २४ हजार ६६८ नागरिकांनी महानगरपालिकेत अर्ज सादर केलेत. ज्या अर्जदारांचे कौटुंबिक उत्पन्न अतिशय अल्प आहे, शिवाय त्यांच्याकडे स्वत:ची जमीन उपलब्ध नाही. अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह मनपाला प्राप्त झाल्यानंतर छाणनीचे काम केल्या जात आहे. मात्र, अर्जांचा विचार केल्यास किती व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू शकेल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. शहरातील झोपडपट्टी भागात राहणाºया नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे पुढे काय झाले याविषयी वारंवार विचारणा केली जात आहे. ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मिळणार आहे. परंत, महत्त्वाचा वाटा महानगरपालिकेलाही उचलावा लागेल. त्यासाठी सामाजिक दायित्वाच्या नावाखाली विविध उद्योग कपंन्या, संस्थांकडून निधी गोळा करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिका प्रशासनापुढे आहे. झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरकुलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला आर्थिक पर्याय काढलाच लागेल. लोकप्रतिनिधींनी धाडसाने निर्णय घेतल्यास घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो नागरिकांना भाड्याच्या घरात राहून कसेबसे आयुष्य ढकलण्याची वेळ येणार नाही. प्राप्त अर्जांपैकी किती अर्जांना मंजुरी देण्यात आली, हे अजूनही स्पष्ट झाले नाही.