शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी चंद्रपुरात २४ हजार ६६८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:54 IST

शहराची व्याप्ती दरवर्षी वाढत असताना घरांचा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला़ वाढती महागाई आणि जमिनीच्या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे तर हाल सुरू आहेत़.....

ठळक मुद्देआर्थिक झळ सोसून भरले अर्ज : हजारो नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची व्याप्ती दरवर्षी वाढत असताना घरांचा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला़ वाढती महागाई आणि जमिनीच्या प्रश्नामुळे हजारो नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे तर हाल सुरू आहेत़ त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वांसाठी घरे २०१२ याचा लाभ घेण्यासाठी शहरातील २४ हजार ६६८ नागरिकांनी महानगरपालिकडे अर्ज सादर केले़ या अर्जांची छाणनी करून पात्र नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेची मोठी दमछाक होणार आहे़सर्वसामान्य नागरिकांना शहरात घर बांधणे आज अशक्य बाब आहे. कुटुंबाचा प्रपंच भागविताना हक्काचे घरकुल उभारणे म्हणजे मोठे अग्निदिव्यच आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जागा विकत घेवून घर बांधणे सर्वसामान्य नागरिकांना कदापि शक्य नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) लाभ घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २४ हजार ६६८ नागरिकांनी महानगरपालिकेत अर्ज सादर केलेत. ज्या अर्जदारांचे कौटुंबिक उत्पन्न अतिशय अल्प आहे, शिवाय त्यांच्याकडे स्वत:ची जमीन उपलब्ध नाही. अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह मनपाला प्राप्त झाल्यानंतर छाणनीचे काम केल्या जात आहे. मात्र, अर्जांचा विचार केल्यास किती व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू शकेल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. शहरातील झोपडपट्टी भागात राहणाºया नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे पुढे काय झाले याविषयी वारंवार विचारणा केली जात आहे. ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मिळणार आहे. परंत, महत्त्वाचा वाटा महानगरपालिकेलाही उचलावा लागेल. त्यासाठी सामाजिक दायित्वाच्या नावाखाली विविध उद्योग कपंन्या, संस्थांकडून निधी गोळा करण्याचे मोठे आव्हान महानगरपालिका प्रशासनापुढे आहे. झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरकुलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला आर्थिक पर्याय काढलाच लागेल. लोकप्रतिनिधींनी धाडसाने निर्णय घेतल्यास घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो नागरिकांना भाड्याच्या घरात राहून कसेबसे आयुष्य ढकलण्याची वेळ येणार नाही. प्राप्त अर्जांपैकी किती अर्जांना मंजुरी देण्यात आली, हे अजूनही स्पष्ट झाले नाही.