शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

पहाटेच्या संधीप्रकाशातच लख्ख उजळून निघते गाव

By admin | Updated: March 13, 2015 01:10 IST

हातात झाडू घेऊन फोटो काढणे आणि प्रसिद्धी मिळविणे ही आता फॅशन झाली आहे. मात्र कोटगावातील ग्रामस्थ नित्यनेमाने मागील काही महिन्यांपासून पहाटे उठून गाव स्वच्छ करीत आहेत.

घनश्याम नवघडे ल्ल नागभीड हातात झाडू घेऊन फोटो काढणे आणि प्रसिद्धी मिळविणे ही आता फॅशन झाली आहे. मात्र कोटगावातील ग्रामस्थ नित्यनेमाने मागील काही महिन्यांपासून पहाटे उठून गाव स्वच्छ करीत आहेत. एवढेच नाही तर आजपर्यंत ३ लाख ५० हजार रुपयांचे नागरिकांनी श्रमदान केले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून कोटगावची ओळख आहे. मात्र स्वच्छता अभियान आणि गावाच्या विकासासाठी जातपात आणि राजकारण विसरून नागरिक एकत्र आले आहे. यातून गावाचा चेहरा बदलत आहे. नित्यनेमाने दररोज पहाटे ४ वाजता गावकरी एकत्र येतात आणि पहाटेच्या काळोखात गाव झाडून स्वच्छ करतात. त्यानंतर श्रमदानही केले जाते. आजपर्यंत गावकऱ्यांनी तीन लाख ५० हजार रुपयाचे श्रमदान केले आहे. या श्रमदानात गावातील नाल्या-गटारे साफ केले. गावातील मोकळी जागा स्वच्छ करून ती सार्वजनिक कामासाठी तयार केली. काही रस्त्यांची दुरुस्ती केली, श्रमदानातून शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी आदी कामांचा यात समावेश आहे. या अभियानात सातत्य रहावे यासाठी दर चार-पाच दिवसात पुढे काय करायचे, यावर विचारविमर्श करण्यासाठी सभा घेतली जाते. सभेमध्ये गावाच्या मध्यभागी बाग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावात प्रवेशद्वार आणि ७४०० चौरस फूट जागेला श्रमदानातून संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला. येत्या काही दिवसात संपूर्ण गावातील घरांना तसेच शासकीय इमारतींना एकाच रंगाने रंगरंगोटी करण्याचाही ग्रामस्थांचा मानस आहे.