शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जमीन महसूल अधिनियमालाच मनपाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:23 IST

वीज वितरण कंपनीने शहरामध्ये ११ केव्हीचे सहा हजार ३६२ खांब, १९ हजार ६९३ एलटी खांब आणि ८०३ डीपी लावून ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. या सर्व खांबांवर महानगरपालिकेने ९९ लाख ४५ हजार ७७५ रूपयांचा कर आकारला.

ठळक मुद्देकर आकारणीचा वाद : वीज खांबांचा कर भरण्यास महावितरणचा नकार

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वीज वितरण कंपनीने शहरामध्ये ११ केव्हीचे सहा हजार ३६२ खांब, १९ हजार ६९३ एलटी खांब आणि ८०३ डीपी लावून ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. या सर्व खांबांवर महानगरपालिकेने ९९ लाख ४५ हजार ७७५ रूपयांचा कर आकारला. मात्र, ६ डिसेंबर १९९६ मध्ये जारी केलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत मनपाला हा कर लावता येत नाही, असा दावा महावितरण कंपनीने केला. त्यामुळे मनपाने शासकीय अधिनियमालाच आव्हान दिल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून वाद पेटण्याची लक्षणे दिसत आहेत.महानगरपालिकेने २८ डिसेंबर २०१७ ला सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ७३ अन्वये महानगर पालिका क्षेत्रातील विद्युत खांब व डीपीवर कर आकारणीचा निर्णय घेतला. हा तातडीने जमा करावी, अशी नोटीस महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना पाठविली. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १२७ अन्वये मनपा हद्दीतील खुल्या जागेचा वापर करीत असलेल्या मालमत्तेवर कर आकारणी करण्याचा मनपाला अधिकार आहे, असा दावा मनपाने नोटीसद्वारे केला आहे. ११ केव्ही, एलटी खांब आणि डीपीवर ९९ लाख ४५ हजार ७७५ रूपयांचा कर आकारणी एका वर्षासाठी केल्याचे नमूद केले. दरम्यान, ही नोटीस महावितरणला मिळाल्यानंतर २७ फेब्रुवारीला कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला पत्राद्वारे उत्तर म्हटले, की सदर बिलामध्ये कर आकारणीचा कोणताही तपशिल दर्शविला नाही. व किती मालमत्तेवर कर आकारणी केली याचाही उल्लेख नाही. शासनाच्या कोणत्या तरतूदीनुसार कर आकारणी झाली, याचा अर्थबोध होत नसल्याने संबंधित तपशिल पाठवावा. अन्यथा बिल काढता येणार नाही, असे महावितरणे उत्तरात नोंदविले. महानगरपालिकेने तपशिलच न दिल्याने ९९ लाख ४५ हजार ७७५ हजारांचा कर कोणत्या आधारावर भरायचा, हा प्रश्न महावितरणने उपस्थित केला आहे. दरम्यान, १६ मार्च २०१८ ला महावितरणने मनपाला पुन्हा पत्र पाठवून शहरातील विद्युत खांबावर मनपाला कर आकारणी अधिकार नाही, असा थेट दावा केला. ६ डिसेंबर १९९६ ला जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, ‘नगरपालिका व शासकीय जमिनीच्या वापराबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ च्या नियम ३९ व्या पोटकलम १ अन्वये महाराष्ट्र राज्य वीज मंडळात खुल्या जागेवर असे कोणतेही भाडे भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.’ असे स्पष्टपणे नमूद केल्याचा दावा महावितरणने केला. पुरावा म्हणून संबंधित आदेशाची प्रतही मनपाला महावितरणने सादर करून १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत कर भरण्यापासून वीज वितरण कंपनीला सुट मिळाली आहे. परिणामी हा कर रद्द करावा, अशी मागणीही महावितरणचे मुख्य अभियंता घुघल यांनी पत्राद्वारे केली आहे. दावे-प्रतिदाव्यांनी हे प्रकरण चांगलेच गाजणार आहे.अकोला, औरंगाबादचा प्रयत्न फसलाशहरातील हद्दीतील वीज खांब, डिपीवर अकोला व औरंगाबाद मनपाने कर आकारला होता. त्यामुळे मनपा व महावितरणमध्ये वाद उफाळून आल्याची घटना ताजी आहे. केंद्रीय वीज कायदा, वीज आयोगाच्या तरतुदींचा आधार घेऊन हे प्रकरण मंत्रालयात पोहोचले, दरम्यान, मनपाचा दावा टिकू शकला नाही. चंद्रपूर मनपाने महावितरणवर वीज आकारणीचे धाडस केले. मात्र त्यांचा हा दावा टिकणार काय, असा प्रश्न जागृत नागरिकांमधून विचारला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचेही लक्ष लागले आहे.ग्राहकांवरच जादा भुर्दंड बसेलकेंद्र सरकारचा विद्युत कायदा २००३ व मनप प्रांतिक अधिनियम १९४९ हा आजही लागू आहे. हे दोन्ही कायदे महत्त्वपूर्ण असले तरी केंद्रीय विद्युत कायद्याला अधिक प्राधान्य दिले जाते. विद्युत वितरण कंपनीची सेवा ही नागरिकांच्या हितासाठी असून न. प. व मनपा क्षेत्रात वीज खांब उभारण्यास महाराष्ट्र जमीन अधिनियम अंतर्गत महावितरणला मुभा आहे. मनपाच्या बाजूने सिद्ध झाल्यासग्राहकांवर अतिरिक्त वीजभार आकारू शकते. मनपाने आकारलेला प्रतिवर्षी ९९ लाख ४५ हजार ७७५ रुपयांचा कर लक्षात घेतल्यास महावितरण चंद्रपुरातील प्रत्येक ग्राहकाकडून प्रतिवर्षी ११७.०३ रुपये व दरमहा ९ रुपये ७५ पैसे ग्राहकांच्या खिशातून वसूल करू शकते.