शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

उमेद आंदोलनात सीईओंना करावी लागणार मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी ...

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी संतापले असून विविध मार्गाने आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, १४-१५ डिसेंबर रोजी मुंबईत कुटुंबासह कर्मचारी धडकणार असून सरकारकडे आत्महत्येेची परवानगी मागणार आहे. त्यामु‌ळे उमेद प्रशासनाची झोप उडाली असून अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी राज्यभरातील सर्व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या कर्मचाऱ्यांची मनधरणी करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे तसेच तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कशी मनधरणी करणार

याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटीपद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्याच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून नव्याने पदभरती करण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचालीसुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. दरम्यान विविध आंदोलन, मोर्चा काढून या कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याने आता कर्मचारी कुटुंबासह थेट मुंबईला धडक देणार आहे. विशेष म्हणजे, या आंदोनात मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागणार आहे. या आंदोलनाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाती मुख्य कार्यकारी अधिकारी उय जाधव यांनी दखल घेतली असून आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, राज्यभरातील सर्व सीईओंना पत्र पाठवून मंत्रालयावरील धडक मोर्चापासून त्यांना परावृत्त करून मनधरणी करून आवश्यत उपाययोजना करावी तसेच आंदोलनाचा कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक तरतूद करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र

विविध आंदोलन करूनही शासनस्तरावर कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उमेद अभियानातील १० हजार कर्मचारी कुटुंबीयांसोबत मुंबईत आंदोलन करणार आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला ई-मेलद्वारे माहिती दिली असून सर्वात शेवट सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र असेही लिहण्यास विसरले नाही. त्यामुळे हे आंदोलन नेमके कोणती वळण घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.