शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

उमेद आंदोलनात सीईओंना करावी लागणार मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी ...

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी संतापले असून विविध मार्गाने आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, १४-१५ डिसेंबर रोजी मुंबईत कुटुंबासह कर्मचारी धडकणार असून सरकारकडे आत्महत्येेची परवानगी मागणार आहे. त्यामु‌ळे उमेद प्रशासनाची झोप उडाली असून अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी राज्यभरातील सर्व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या कर्मचाऱ्यांची मनधरणी करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे तसेच तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कशी मनधरणी करणार

याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटीपद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्याच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून नव्याने पदभरती करण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचालीसुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. दरम्यान विविध आंदोलन, मोर्चा काढून या कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याने आता कर्मचारी कुटुंबासह थेट मुंबईला धडक देणार आहे. विशेष म्हणजे, या आंदोनात मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागणार आहे. या आंदोलनाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाती मुख्य कार्यकारी अधिकारी उय जाधव यांनी दखल घेतली असून आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, राज्यभरातील सर्व सीईओंना पत्र पाठवून मंत्रालयावरील धडक मोर्चापासून त्यांना परावृत्त करून मनधरणी करून आवश्यत उपाययोजना करावी तसेच आंदोलनाचा कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक तरतूद करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र

विविध आंदोलन करूनही शासनस्तरावर कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उमेद अभियानातील १० हजार कर्मचारी कुटुंबीयांसोबत मुंबईत आंदोलन करणार आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला ई-मेलद्वारे माहिती दिली असून सर्वात शेवट सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र असेही लिहण्यास विसरले नाही. त्यामुळे हे आंदोलन नेमके कोणती वळण घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.