शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

शतकोटी वृक्ष लागवडीचा फज्जा !

By admin | Updated: May 15, 2014 01:06 IST

पर्यावरणाचे संरक्षण काळाची गरज असून दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे देशात प्रचंड उष्णता निर्माण होत असल्याचे संकेत मिळत असतानाच ..

राजुरा : पर्यावरणाचे संरक्षण काळाची गरज असून दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे देशात प्रचंड उष्णता निर्माण होत असल्याचे संकेत मिळत असतानाच राज्य शासनाने ग्रामपंचायतींमार्फत वृक्ष संवर्धनासाठी शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठय़ा थाटात जिल्हाभर राबविण्यात आला. मात्र या शतकोटी वृक्ष संवर्धन योजनेचा फज्जा उडाला आहे.कोणत्याही ग्रामपंचायतीनी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली नाही. पावसाळा सुरू झाला की अनेक सामाजिक संस्था दरवर्षी झाडे लावतात. ती झाडे एक दोन महिने जिवंत राहतात आणि कालांतराने ती नाहिशी होतात. शासन दरवर्षी अनेक विभागामार्फत वृक्ष लागवडीचे काम हाती घेते. उन्हाळ्यामध्येच खड्डे खोदून ठेवले जाते. खड्डा खोदताना नियमानुसार खोदला जात नाही, जेवढे खड्डे असले पाहिजे तेवढे खोदण्यात येत नाही. पावसाळा सुरू झाला की झाडे लावण्याची लगबग सुरू होते. दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठय़ा थाटामाटात वृक्षदिंड्या काढल्या जातात. वृक्ष जगविण्याचा संदेश दिला जातो. सर्व शासनाचे प्रतिनिधी एकत्र येऊन झाडे लावतात. परंतु झाडे लावल्यानंतर जगतात किती, याची शहानिशा कुणीच करीत नाही. फक्त झाडे लावा परंतु ती झाडे कशी जगविता येईल, त्या झाडाला पाणी टाकणारी यंत्रणा कोण राबविणार, याचे काहीच नियोजन नसते. फक्त झाडे लावून राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हेच कार्य डोळ्यासमोर ठेऊन सर्व सामाजिक व राजकीय यंत्रणा वृक्ष संवर्धनाचे कार्य करीत असतात. राजुरा तालुक्यातील ६0 टक्के ग्रामपंचायतीमध्ये शतकोटी वृक्ष संवर्धन योजनेचा फज्जा उडाला आहे. वृक्ष लावल्यानंतर ते जागविण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. काही ग्रामपंचायतीच्या परिसरात रोपटे पडून पडून वाळून गेले. परंतु रोपटे लावण्यातच आले नाही. शासन योजना राबवित असतात. परंतु ढेपाळलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे सर्व योजना फोल ठरत आहे. जोपर्यंत योजनेची अंमलबजावणी योग्य तर्‍हेने होणार नाही, तोपर्यंत शासनाचा उद्देशही पूर्ण होणार नाही. सर्व योजना केवळकागदावरच राहतील, हे निश्‍चित. (शहर प्रतिनिधी)