शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

केंद्राकडे आरक्षणाची शिफारस आचारसंहितेपूर्वी करावी

By admin | Updated: August 31, 2014 23:42 IST

भारतीय राज्यघटनेचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश आहे. त्यात धनगर ऐवजी धनगड अशी चुक झाली आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात नसुन धनगर आहे.

वरोरा : भारतीय राज्यघटनेचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश आहे. त्यात धनगर ऐवजी धनगड अशी चुक झाली आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात नसुन धनगर आहे. त्यामुळे धनगर समाजाला अनुसुुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे आचारसंहितेपूर्वी करावी, अशा मागणीचे निवेदन शनिवारी धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती वरोराच्यावतीने उपविभागीय अधिकारी ए.पी. लोढे यांना देण्यात आले.भारताच्या संविधानामध्ये ज्या जाातींना विशेष सवलती देण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली, त्यांपैकी अनुसुचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश आहे. संविधानाच्या भाषेवर इंग्रजीचे प्रभुत्व, उच्चार पद्धतील दोष, अपभ्रंशाचा राजकिय संधीसाधू पुढाऱ्यांनी हिंदीत ‘र’ चा उच्चार ‘ड’ करून धनगर व धनगड जमाती वेगळ्या असल्याचे भासविले. त्या माध्यमातून सरकारने मागील ६५ वर्षांपासून धनगर समाजाची अनुसुचित जमातीची मुळ मागणी बाजुला ठेवून १९९० मध्ये भटक्या जमातीचे ३.५ टक्के महाराष्ट्रात आरक्षण देवून संविधानाचा, लोकशाहीचा व समाजाचा उपमर्द केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी राज्य सरकारने १९६६ व १९७८ ला धनगर समाजाला महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जमातीच्या यादीत समाविष्ठ करून आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. याचा अर्थ राज्य सरकारला हे आरक्षण मान्य आहे. मात्र राखीव आरक्षण धनगरांना मिळल्यास आपले अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेवून मागील ६५ वर्षांपासून आरक्षण न मिळू देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षण आमचा हक्क आहे. हक्कासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारची झोप उडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलतीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी व समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तशी विनंती उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे यांच्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गजानन शेळके, डॉ. ज्ञानेश्वर सरवदे, मनोज चिडे, धनराज ठमके, शिरीष उगे, प्रभाकर ढोले, अशोक वैद्य, दिलीप तुराळे, आत्माराम मुलगीर, भूषण झिले, निकेश मोटके, परशुराम येडे, विनोद शेळकी, रविंद्र गावंडे, श्रीकृष्ण चिडे, उमेश खानेकर, डॉ. व्ही.एम. माहुरे, बबन निकुंबे, मोहन मसाडे, सुमित घोडे, प्रशांत काळे, बापूराव झाडे, छाया धवने, वंदना काळे, राजेंद्र तुरारे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)