शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडे आरक्षणाची शिफारस आचारसंहितेपूर्वी करावी

By admin | Updated: August 31, 2014 23:42 IST

भारतीय राज्यघटनेचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश आहे. त्यात धनगर ऐवजी धनगड अशी चुक झाली आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात नसुन धनगर आहे.

वरोरा : भारतीय राज्यघटनेचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर धनगर समाजाचा समावेश आहे. त्यात धनगर ऐवजी धनगड अशी चुक झाली आहे. महाराष्ट्रात धनगड ही जात नसुन धनगर आहे. त्यामुळे धनगर समाजाला अनुसुुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे आचारसंहितेपूर्वी करावी, अशा मागणीचे निवेदन शनिवारी धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती वरोराच्यावतीने उपविभागीय अधिकारी ए.पी. लोढे यांना देण्यात आले.भारताच्या संविधानामध्ये ज्या जाातींना विशेष सवलती देण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली, त्यांपैकी अनुसुचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश आहे. संविधानाच्या भाषेवर इंग्रजीचे प्रभुत्व, उच्चार पद्धतील दोष, अपभ्रंशाचा राजकिय संधीसाधू पुढाऱ्यांनी हिंदीत ‘र’ चा उच्चार ‘ड’ करून धनगर व धनगड जमाती वेगळ्या असल्याचे भासविले. त्या माध्यमातून सरकारने मागील ६५ वर्षांपासून धनगर समाजाची अनुसुचित जमातीची मुळ मागणी बाजुला ठेवून १९९० मध्ये भटक्या जमातीचे ३.५ टक्के महाराष्ट्रात आरक्षण देवून संविधानाचा, लोकशाहीचा व समाजाचा उपमर्द केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी राज्य सरकारने १९६६ व १९७८ ला धनगर समाजाला महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जमातीच्या यादीत समाविष्ठ करून आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. याचा अर्थ राज्य सरकारला हे आरक्षण मान्य आहे. मात्र राखीव आरक्षण धनगरांना मिळल्यास आपले अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेवून मागील ६५ वर्षांपासून आरक्षण न मिळू देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षण आमचा हक्क आहे. हक्कासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरून राज्य सरकारची झोप उडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलतीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी व समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तशी विनंती उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे यांच्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गजानन शेळके, डॉ. ज्ञानेश्वर सरवदे, मनोज चिडे, धनराज ठमके, शिरीष उगे, प्रभाकर ढोले, अशोक वैद्य, दिलीप तुराळे, आत्माराम मुलगीर, भूषण झिले, निकेश मोटके, परशुराम येडे, विनोद शेळकी, रविंद्र गावंडे, श्रीकृष्ण चिडे, उमेश खानेकर, डॉ. व्ही.एम. माहुरे, बबन निकुंबे, मोहन मसाडे, सुमित घोडे, प्रशांत काळे, बापूराव झाडे, छाया धवने, वंदना काळे, राजेंद्र तुरारे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)