शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावागावांत पोहोचवा!

By admin | Updated: September 27, 2016 00:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत.

हंसराज अहीर : भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावाचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत. भाजपप्रणित महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू करून त्या योजना सर्व स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून सुरू केला असला तरी या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याची व या योजनांचा लाभ गावागावातील लाभार्थ्यांना मिळवून देण्याकरिता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गोंडपिपरी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. २२ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथील धनोजे कुणबी सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, भाजपा नेते बबनराव निकोडे, निलेश खरबडे, नगर पचायत अध्यक्ष संजय झाडे, अशोक चिचघरे, किशोर अगस्थी, राकेश पुंज, रामदास शेंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगर पंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.अवघ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे देशाच्या विकासामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले असून देश विकासाच्या दिशेने झेपावला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टी व दृढ संकल्पाचा हा परिणाम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच घटकांचे योगदान असल्याखेरीज राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार नाही. ही भूमिका ठेवून प्रधानमंत्री यांनी रोजगार व स्वयंरोजगारावर भर देऊन प्रत्येक हाताला काम देण्याचे धोरण स्वीकारले असून येत्या पाच वर्षात त्यांचे हे स्वप्न साकार होतील, असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. शेती, उद्योग व अन्य संरचनांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना अंमलात आणून त्या योजनांची अंमलबजावणी सक्तीपूर्वक करण्यास प्राधान्य दिले असले तरी भाजपप्रणित सरकारच्या या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्र्त्यांंनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. भाजपाची सहकार क्षेत्रात भक्कमपणे उभारणी करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या हातात सोपविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज असल्याचे सांगत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्र्यांची तसेच मुख्यमंत्र्यांची ‘सक्षम भाजप सक्षम भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुकामध्ये पक्षाला फार मोठे यश संपादन होईल, या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.