शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गावागावांत पोहोचवा!

By admin | Updated: September 27, 2016 00:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत.

हंसराज अहीर : भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावाचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत. भाजपप्रणित महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू करून त्या योजना सर्व स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून सुरू केला असला तरी या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याची व या योजनांचा लाभ गावागावातील लाभार्थ्यांना मिळवून देण्याकरिता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.गोंडपिपरी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. २२ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथील धनोजे कुणबी सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, भाजपा नेते बबनराव निकोडे, निलेश खरबडे, नगर पचायत अध्यक्ष संजय झाडे, अशोक चिचघरे, किशोर अगस्थी, राकेश पुंज, रामदास शेंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगर पंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.अवघ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे देशाच्या विकासामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले असून देश विकासाच्या दिशेने झेपावला आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टी व दृढ संकल्पाचा हा परिणाम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच घटकांचे योगदान असल्याखेरीज राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार नाही. ही भूमिका ठेवून प्रधानमंत्री यांनी रोजगार व स्वयंरोजगारावर भर देऊन प्रत्येक हाताला काम देण्याचे धोरण स्वीकारले असून येत्या पाच वर्षात त्यांचे हे स्वप्न साकार होतील, असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. शेती, उद्योग व अन्य संरचनांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना अंमलात आणून त्या योजनांची अंमलबजावणी सक्तीपूर्वक करण्यास प्राधान्य दिले असले तरी भाजपप्रणित सरकारच्या या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्र्त्यांंनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले. भाजपाची सहकार क्षेत्रात भक्कमपणे उभारणी करण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या हातात सोपविण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची गरज असल्याचे सांगत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्र्यांची तसेच मुख्यमंत्र्यांची ‘सक्षम भाजप सक्षम भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुकामध्ये पक्षाला फार मोठे यश संपादन होईल, या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.