शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

चंद्रपूरलगतच्या उद्योगांवर बंदीचे सावट

By admin | Updated: December 28, 2015 01:30 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषत: चंद्रपूर परिसरातील अनेक उद्योग बंद होत असल्याने या उद्योगांमध्ये कामावर असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

कामगारांची उपासमार : पर्यावरण व उद्योग राज्यमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषत: चंद्रपूर परिसरातील अनेक उद्योग बंद होत असल्याने या उद्योगांमध्ये कामावर असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. उद्योग बंद होत असताना या उद्योगांना पूर्ववत सुरु ठेवता यावे, यासाठी शासनस्तरावरुन धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. मात्र शासन स्तरावरुन कुठलीही मदत मिळत नसल्याने उद्योगांवर बंदीचे सावट आले आहे. पर्यायाने या उद्योगांमध्ये कामावरील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. कामगार व उद्योगांची ही गंभीर अवस्था लक्षात घेता सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे महेश मेंढे यांनी राज्याचे पर्यायवरण व उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना प्रत्यक्ष भेटून केली व एका निवेदनाद्वारे परिस्थिती अवगत करुन दिली.यावेळी झालेल्या चर्चेत ना.पोटे यांनी सकारात्मक उत्तर देत उद्योगांवरील बंदीच्या सावटाबाबत सरकार लवकरच उपाययोजना करेल, अशी ग्वाही दिली. चर्चेदरम्यान महेश मेंढे यांनी प्रदूषणाच्या विषयावरील गंभीरताही मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून देत घुग्घुस शहरालगत असलेल्या कोल हॅण्डलिंग प्लान्टमुळे हजारो नागरिकांना श्वसन, खोकला, दमा यासारख्या अजाराने ग्रासले असून अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. यामुळे सदर कोल हॅण्डलींग प्लान्ट घुग्घुस शहराच्या बाहेर किमान पाच किंमी दूर नेण्यात यावा, अशी मागणीही मेंढे यांनी ना.प्रविण पोटे यांच्याकडे केली.चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी कामगारांनी अनेकदा संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र संबंधित विभागाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या उद्योगांना सुरु करण्यासाठी आपण संबंधित विभागांना निर्देश द्यावे व कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी महेश मेंढे यांनी यावेळी केली. चंद्रपूर एमआयडीसीमध्ये सुरु असलेले निम्म्याकडून अधिक उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील शेकडो कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे, याकडे मेंढे यांनी ना.प्रविण पोटे यांचे लक्ष वेधले.यात वीजनिर्मिती प्रकल्पासह अन्य उद्योगांचाही समावेश आहे. गुप्ता पॉवर एनर्जी लि.उसेगाव, ग्रेस इंडस्ट्रीज, धारीवाल इन्फ्रा, सिद्धबली इस्पात, चमन मेटॅलिक आदी प्रमुख उद्योगांनाही बंदीचा फटका बसला असून येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल शासन उपलब्ध करुन देण्यास असमर्थ ठरत असल्याने येथी उद्योजक त्रस्त झाले असल्याची माहितीही मेंढे यांनी ना. प्रविण पोटे यांना निवेदनातून दिली. (प्रतिनिधी)