लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा येथे शासनाची सीसीआय कापूस खरेदी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ६४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.देशावर कोरोना संकटाची गडद छाया आहे. राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे शासनाकडून राजुरा येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी पहिल्या दिवशी राजुरा येथील तुलाना किसान जिनींगवर दिवस अखेर २३ शेतकऱ्यांचा ६४७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कापसाचे तीन ग्रेड पाडले असून चांगल्या प्रतिच्या कापसाला ५,३५५ रुपये भाव, मध्यम प्रतिच्या कापसाला ५३०१ रुपये भाव तर कमी प्रतिच्या कापसाला ५,१८९ रुपये भाव देण्यात आला आहे. राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपर्यंत ७ हजार सहाशे पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे.सीसीआय खरेदीसाठी पुन्हा जिंनिग सुरू करावे लागणारराजुरा येथे सोमवारपासून सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरुवात झाली असून शेतकºयांनी सात हजार ६००पेक्षा अधिक संख्येने बाजार समितीकडे सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असल्याने दरदिवशी २३ शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाडया कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने राजुरा परिसरातील इतर जिनींगवर सीसीआय कापूस सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
पहिल्या दिवशी सीसीआयची ६४७ क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST