शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जलसंकट उद्भवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:10 IST

यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली.

ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : बंद हातपंप दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली. विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले. परिणामी, नैसर्गिक जलस्त्रोतांची पातळी खालावली आहे. पाण्याअभावी काही विहिरी व हातपंप कोरड्या झाल्या आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी योग्य प्रयत्न झाले नाही. काही कंपन्यांनी पिण्याचे पाणी उद्योगासाठी वळविले, असाही आरोप केला जात आहे. उपसा जास्त असल्याने जमिनीच्या आतल्या पाण्याची पातळी दिवसागणिक खाली जात आहे. तालुकास्तरावरही हेच चित्र दिसून येते. अनेक वॉर्डांमध्ये खासगी हातपंप खोदून वारेमाप उपसा केला जात आहे. यासाठी भूजल विभागाची परवानगी घेतली नाही. जिल्ह्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.नदी, नाले आटताहेतउद्योग कंपन्यांचे पाणी नदीत जात असल्याने प्रदूषित झाल्या आहेत. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत असतो. माणसाला जगायला व विकास करायलाही पाणी लागते. परंतु, नियोजन नसल्याने पुढील महिन्यात पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. कंपन्यांनी नदीच्या साह्याने प्रगती केली पण पाण्याची शुद्धता राखली नाही. रासायनिक पाणी सोडून नद्यांची बहुजैविकता नष्ट केली. या नद्यांना नाले जोडून आहेत. याचा अनिष्ट परिणाम नाल्यांवर झाला. राज्य सरकारने जलधोरण तयार केले. यातील तरतुदींची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याचा आरोप जिल्ह्यातील सरपंचांनी केला आहे.पिके संकटातशेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडला. यावर अद्याप उपाययोजना झाली नाही. पाण्याअभावी वर्षातून एकदा धानाची शेती केली जाते. नाल्याद्वारे पाण्याचा वापर होतो. भात शेतीनंतर भाजीपाला पिके घेता येत नाही. आता तर सर्वच पिके संकटात आहेत.आजाराचा धोकाजिल्ह्यातील काही गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील आदिवासी व कोलाम पाड्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. मार्च महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात पाणीच मिळत नसल्याने कुठूनही ही गरज भागविण्यासाठी गावकरी हतबल झाले. यातून विविध आजारांची लागण होऊ शकते.