शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

ग्रामीण भागात जलसंकट उद्भवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:10 IST

यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली.

ठळक मुद्देउपाययोजनांची गरज : बंद हातपंप दुरुस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदा जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील जलस्त्रोतांची पातळी खालावली. यावर तातडीने उपाययोजना केली नाही पिण्याचे पाणी आणि कृषी सिंचनाचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.ग्रामीण भागात विहिरी व हातपंपांची संख्या वाढली. विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले. परिणामी, नैसर्गिक जलस्त्रोतांची पातळी खालावली आहे. पाण्याअभावी काही विहिरी व हातपंप कोरड्या झाल्या आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी योग्य प्रयत्न झाले नाही. काही कंपन्यांनी पिण्याचे पाणी उद्योगासाठी वळविले, असाही आरोप केला जात आहे. उपसा जास्त असल्याने जमिनीच्या आतल्या पाण्याची पातळी दिवसागणिक खाली जात आहे. तालुकास्तरावरही हेच चित्र दिसून येते. अनेक वॉर्डांमध्ये खासगी हातपंप खोदून वारेमाप उपसा केला जात आहे. यासाठी भूजल विभागाची परवानगी घेतली नाही. जिल्ह्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.नदी, नाले आटताहेतउद्योग कंपन्यांचे पाणी नदीत जात असल्याने प्रदूषित झाल्या आहेत. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत असतो. माणसाला जगायला व विकास करायलाही पाणी लागते. परंतु, नियोजन नसल्याने पुढील महिन्यात पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. कंपन्यांनी नदीच्या साह्याने प्रगती केली पण पाण्याची शुद्धता राखली नाही. रासायनिक पाणी सोडून नद्यांची बहुजैविकता नष्ट केली. या नद्यांना नाले जोडून आहेत. याचा अनिष्ट परिणाम नाल्यांवर झाला. राज्य सरकारने जलधोरण तयार केले. यातील तरतुदींची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याचा आरोप जिल्ह्यातील सरपंचांनी केला आहे.पिके संकटातशेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीचा पोत बिघडला. यावर अद्याप उपाययोजना झाली नाही. पाण्याअभावी वर्षातून एकदा धानाची शेती केली जाते. नाल्याद्वारे पाण्याचा वापर होतो. भात शेतीनंतर भाजीपाला पिके घेता येत नाही. आता तर सर्वच पिके संकटात आहेत.आजाराचा धोकाजिल्ह्यातील काही गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील आदिवासी व कोलाम पाड्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. मार्च महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात पाणीच मिळत नसल्याने कुठूनही ही गरज भागविण्यासाठी गावकरी हतबल झाले. यातून विविध आजारांची लागण होऊ शकते.