शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

उमेदवारांची कसोटी

By admin | Updated: October 6, 2014 23:10 IST

सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका निर्णय घेतला असल्याने रिंगणात उमेदवारांची संख्या वाजवीपेक्षा जास्त आहे. वाढत्या महागाई सोबतच

राजकुमार चुनारकर - खडसंगी सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका निर्णय घेतला असल्याने रिंगणात उमेदवारांची संख्या वाजवीपेक्षा जास्त आहे. वाढत्या महागाई सोबतच निवडणुकीचा खर्चही अमाप वाढला आहे. मात्र यंदाची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना २८ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आयोगाने आखून दिली असल्याने त्यांना २८ लाख रुपयात विधानसभेचा संपूर्ण खर्च निपटविण्याची कसरत करावी लागणार आहे.२००९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्च तब्बल १३ लाख रुपयांनी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेली खर्चाची मर्यादा आता २८ लाख करण्यात आली आहे. ही मर्यादा मागच्या निवडणुकीत १५ लाख होती. त्यासोबतच यंदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अनामत रक्कम दुप्पट करून १० हजार रुपये करण्यात आली आहे. असे असले तरी आरक्षित संवर्गातील उमेदवारांना मात्र निम्मीच अनामत रक्कम भरावी लागली. अनुसूचीत जाती जमाती संवर्गातील उमेदवारांना ही रक्कम गेल्या निवडणुकीत अडीच हजार रुपये होती.पाच वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंतच्या कालखंडात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.१२ व्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी या दोन्ही फाटाफुट झाली असल्याने जवळपास सर्वच प्रमुख पक्षाने स्वतंत्र विधानसभा निवडणुका लढवित आहेत. त्यामुळे उमेदवार अधिक आणि कार्यकर्ते कमी, अशी काहीशी अवस्था सध्या सर्वच मतदार संघात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी उमेदवारांना खर्चाचा हात सैल सोडावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख उमेदवारांना मोठा खर्च करावा लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवून जवळपास दुप्पट केली असली तरी या निर्धारित रकमेत निवडणुकीचा खर्च करणे उमेदवारांना शक्य होणार नाही. त्यामुळे झालेला खर्च २८ लाखांच्या मर्यादेत बसविण्याकरिता व रोजच्या खर्चाचा ताळेबंद सादर करण्याकरिता सर्वच उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती बऱ्याच मतदार संघात सारखी असली तरी आयोगाने वाढवून दिलेल्या या खर्च मर्यादेमुळे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मात्र अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे.