शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

मुद्रांक शुल्क वाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:08 IST

राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दरवाढ करुन समाजातील सर्वसामान्य माणसाला न्यायालयापासून दूर ठेवण्याचा प्रकार चालविला आहे.

आॅनलाईन लोकमतभद्रावती: राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दरवाढ करुन समाजातील सर्वसामान्य माणसाला न्यायालयापासून दूर ठेवण्याचा प्रकार चालविला आहे. हा प्रकार बंद करून मुद्रांक शुल्कवाढ रद्द करावी, अशी मागणी तालुका अधिवक्ता संघाने केली. तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.१६ जानेवारी २०१७ ला महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून कोर्ट फी कायद्यात अवाढव्य वाढ केली. या वाढीमुळे गरीब जनतेला कोर्टातून न्याय मागणे कठीण होणार आहे. पूर्वी साध्या अर्जाकरीता १० रुपये कोर्ट स्टॅम्प लागत होता. आता त्याकरिता २५ ते ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. विविध प्रकरणांत दावा दाखल करणे तसेच किरकोळ कामासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क लावण्यात आला आहे. ही वाढ चार पट केल्याने गरीबांना संकटांचा सामना करावा लागत आहे. शुल्क वाढीने यापुढे सामान्य नागरिकांना न्यायालयात जाणे कठीण होणार आहे. संविधानाशी प्रामाणिक राहून सरकारने गरीबांच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. न्याय मिळविण्याच्या मार्गात अडचणी वाढविण्याचे धोरण राबविणे चुकीचे आहे. मात्र, शुल्क वाढीने मोठा अन्याय झाला. राज्य सरकारने ही शुल्क वाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी तालुका अधिवक्ता संघाने तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. अध्यक्ष अ‍ॅड. उद्धव पलिकुंडावार यांच्या नेतृत्वात अ‍ॅड.शेख, अ‍ॅड. अरुण तामगडे, अ‍ॅड. मिलिंद रायपूरे, अ‍ॅड. भालेराव अ‍ॅड. पथाडे, अ‍ॅड. पाटील. अ‍ॅड. मून, अ‍ॅड. भागवत आदी उपस्थित होते.