शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

२० वर्षानंतर पोहोचले कॅनलचे पाणी

By admin | Updated: December 16, 2014 22:49 IST

कॅनलसाठी अत्यल्प किंमतीत जमीनी दिल्या. कॅनलमधून पाणी येईल व आपल्या जमीनी सिंचीत होणार अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झाले आहे. कॅनलचे

वनोजा गावात आनंद : शेतकऱ्यांनी केले पाणीपूजनवरोरा : कॅनलसाठी अत्यल्प किंमतीत जमीनी दिल्या. कॅनलमधून पाणी येईल व आपल्या जमीनी सिंचीत होणार अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झाले आहे. कॅनलचे पाणी आल्याने वनोजावासियांनी गावातून भजन दिंडी काढून कालव्यावर पाणीपूजन केले. यावेळी पाणी बघून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.वर्धा जिल्ह्यातील लाल पोथरा धरणातील पाणी वरोरा तालुक्यातील तीस गावातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मिळणार असून हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. वीस वर्षापूर्वी वरोरा तालुक्यातील वनोजा गावातील शेतकऱ्यांनी अत्यल्प मोबदल्यात कालव्याकरिता जमिनी दिल्या. काहींच्या शेताचे कालव्यामुळे दोन तुकडेही पडले. परंतु, त्याचीही शेतकऱ्यांनी पर्वा केली नाही. मोबदला जरी कमी मिळाला परंतु, दुबार पीक घेण्याकरिता पाणी मिळेल व आर्थिक पोत सुधारेल, असा समज ठेवून पाण्याकरिता वीस वर्षे वनोजावासीयांनी प्रतीक्षा केली. सिंचनाकरिता पाणी द्यावे याकरिता वनोजावासियांनी लाल पोथरा संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीच्या वतीने पाटबंधारे कार्यालयात आंदोलने करून निवेदन दिली. अखेरीस या हंगामात पाणी वनोजा गावापर्यंत सोडण्यात आले आहे. त्यामुळे वनोजावासीय दुबार पीक घेण्यास सज्ज झाले आहेत. पाणी वापर संस्थेच्या कामाची पद्धत व पाण्याचे महत्व कळावे याकरिता वनोजावासीयांनी आज प्रथमच कालव्यात आलेल्या पाण्याचे पूजन केले. गावातून भजन मंडळीच्या वतीने पाणीदिंडी काढण्यात आली व कालव्यावर जावून पाणी पूजन केले. यावेळी लाल व पोथरा कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर, उपाध्यक्ष कमलाकर मत्ते, सचिव यशवंत सायरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवले, उपविभागीय अभियंता घागी, वाकडे, बोबडे व वनोजा गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. येत्या काही दिवसात कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेंबळ गावापर्यंत पाणी पोहचविण्याचा मानस उपस्थितांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)