शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

वरोरा तालुक्यातील कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे

By admin | Updated: July 16, 2016 01:18 IST

तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले.

मदतीची मागणी : शेतातील बियाणे वाहून गेले वरोरा : तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले. या पाण्याच्या प्रवाहात शेत जमीन खरडून जात बियाणेही वाहून गेल्याने कॅनल शेजारील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वरोरा तालुक्यातील २१ गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत असते. या कॅनलमध्ये वर्धा जिल्ह्यातील धरणामधून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कॅनलमधील पाणी घेऊन शेतकरी सिंचन करीत असतात. कॅनल जुने असल्याने अनेक ठिकाणी क्रॅक झाले आहे, त्याची डागडुजी योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याने दरवर्षी कॅनलला भगदाडे पडून पाणी शेतात जाऊन अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा कॅनल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी दिवसागणिक शाप ठरत असल्यास याचे आश्चर्य वाटू नये. वरोरा, आर्वी, तुमगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांचे पहिल्याच पावसात कॅनलमुळे मोठ्या प्रमाणात शेतातील नुकसान झाले आहे. तुमगाव येथील शेतकरी तारानाथ डोये यांच्या शेतानजीक कॅनलला भगदाड पडल्याने त्यांच्या शेतातील बियाणे वाहून गेले. त्यांनी कसलेली जमीनही खरडून गेल्याची तक्रार पाटबंधारे विभागाकडे नुकतीच केली आहे. पावसापूर्वी कॅनल दुरुस्ती व साफसफाईचे कामे करून हजारो रुपये खर्च केल्यानंतरही कॅनल फुटण्याची डोकेदुखी कायम राहत असल्याने केलेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कामाच्या चौकशीची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)