शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

पडत्या दरात कापूस खरेदी

By admin | Updated: November 29, 2014 01:02 IST

यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी ...

राजुरा : यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी पडत्या दरात खरेदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणे सुरू केले आहे. राजुरा तालुक्यात पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली अडचण दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या घशात नेवून विकण्याची पाळी आली आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. पावसाअभावी प्रथम पेरणी वाया गेली. उसणवारी करुन दुबारपेरणी केली. तेवढ्यात थोडाफार पाऊस पडल्याने कापसाचे झाडे चांगले डोलावयास लागले. नंतर मात्र पावसाने दडी मारली. तसेच कडक उष्णतेमुळे कापसाच्या झाडांना बोटावर मोजण्या इतके बोंड लागले. त्याची प्रथम वेचनी केली असता एकरी एक- दोन क्विंटल कापूस निघाला. वेचनी दरात मजुरांनी मोठी वाढ केली. प्रति किलो पाच रुपये वेचनी करताना रक्कम द्यावी लागत आहे. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना बेभाव कापूस विकावा लागत आहे.सध्या खासगी व्यापारी प्रती क्विंटल ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० दराजे कापूस खरेदी करीत आहे. देवाडा येथील व्यापारी पडत्या दरात कापूस खरेदी करुन आदिवासी व इतर शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बेभाव खरेदी व वजनाता दांडी मारली जात आहे. असे असतानासुद्धा शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे नाईलाजास्तव कापूस विक्री करुन गरज भागवानी लागत आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून देण्याची आशा होती. शेतकऱ्यांनी महागडे बिज खरेदी करुन पेरणी केली. तसेच खत व औषधीच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त होता. त्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे प्रमाण ५० टक्क्यावर आले आहे. जमिनीतील ओलावर नष्ट झाला. थंडी सुद्धा पडत नाही. उष्णतेमुळे झाडे वाळत आहे. सिंचनाची व्यवस्था नाही निसर्गाच्या कृपेवर सर्व अवलंबून असल्यामुळे दुसऱ्या वेचनीनंतर कापसाचे पीक संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कापसावर केलेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसू लागले आहे. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असे संकट उद्भवले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. त्याच्या शिवाय जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना वाढीव दर देणे आवश्यक आहे. हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांना संकटातून काढू शकतो.शेतकऱ्यांची बिकट स्थितीतून सुटका करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करून प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्याची मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते अ‍ॅड. अरुण धोटे यांनी शासनाकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)