शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
4
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
5
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
6
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
7
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
8
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
9
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
10
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
11
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
12
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
13
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
14
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
15
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
16
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
17
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
18
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
20
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
Daily Top 2Weekly Top 5

पडत्या दरात कापूस खरेदी

By admin | Updated: November 29, 2014 01:02 IST

यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी ...

राजुरा : यावर्षी पावसाचे दडी मारली. सिंचनाची व्यवस्था नाही अशा बिकट अवस्थेत शेतातील थोडाफार निघालेला कापूस खासगी व्यापारी पडत्या दरात खरेदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणे सुरू केले आहे. राजुरा तालुक्यात पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना आपली अडचण दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या घशात नेवून विकण्याची पाळी आली आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. पावसाअभावी प्रथम पेरणी वाया गेली. उसणवारी करुन दुबारपेरणी केली. तेवढ्यात थोडाफार पाऊस पडल्याने कापसाचे झाडे चांगले डोलावयास लागले. नंतर मात्र पावसाने दडी मारली. तसेच कडक उष्णतेमुळे कापसाच्या झाडांना बोटावर मोजण्या इतके बोंड लागले. त्याची प्रथम वेचनी केली असता एकरी एक- दोन क्विंटल कापूस निघाला. वेचनी दरात मजुरांनी मोठी वाढ केली. प्रति किलो पाच रुपये वेचनी करताना रक्कम द्यावी लागत आहे. त्या रक्कमेची शेतकऱ्यांना बेभाव कापूस विकावा लागत आहे.सध्या खासगी व्यापारी प्रती क्विंटल ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० दराजे कापूस खरेदी करीत आहे. देवाडा येथील व्यापारी पडत्या दरात कापूस खरेदी करुन आदिवासी व इतर शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बेभाव खरेदी व वजनाता दांडी मारली जात आहे. असे असतानासुद्धा शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे नाईलाजास्तव कापूस विक्री करुन गरज भागवानी लागत आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना हमी भाव वाढवून देण्याची आशा होती. शेतकऱ्यांनी महागडे बिज खरेदी करुन पेरणी केली. तसेच खत व औषधीच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त होता. त्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकाचे प्रमाण ५० टक्क्यावर आले आहे. जमिनीतील ओलावर नष्ट झाला. थंडी सुद्धा पडत नाही. उष्णतेमुळे झाडे वाळत आहे. सिंचनाची व्यवस्था नाही निसर्गाच्या कृपेवर सर्व अवलंबून असल्यामुळे दुसऱ्या वेचनीनंतर कापसाचे पीक संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कापसावर केलेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसू लागले आहे. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असे संकट उद्भवले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. त्याच्या शिवाय जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना वाढीव दर देणे आवश्यक आहे. हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांना संकटातून काढू शकतो.शेतकऱ्यांची बिकट स्थितीतून सुटका करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करून प्रति क्विंटल सहा हजार रुपये दर देण्याची मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते अ‍ॅड. अरुण धोटे यांनी शासनाकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)