शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

लग्न स्थितीमुळे बसेस फुल्ल!

By admin | Updated: May 15, 2014 23:26 IST

जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असताना सुद्धा मे महिन्यात भरगच्च लग्न तिथीमुळे नागरिक घराबाहेर पडून नातेवाईकांच्या, मित्रांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावीत आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असताना सुद्धा मे महिन्यात भरगच्च लग्न तिथीमुळे नागरिक घराबाहेर पडून नातेवाईकांच्या, मित्रांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावीत आहे. सध्या बस स्थानकासह रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. या दोन्ही ठिकाणांना यात्रचे स्वरुप आले आहे. यामुळे बसेस व रेल्वे सध्या फुल्ल आहे.

सध्या सर्वत्र विवाहांची धामधूम सुरू आहे. त्यातच या महिन्यात लग्नतिथी आहे. सुटीचे दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडून लग्नसमारंभाला हजेरी लावत आहे. यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी शहर बसस्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी आहे. त्यातच विवाहासाठी अनेकांनी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक करारावर बुक केल्याने बसेसेची संख्या कमी असल्याच्या कारणाने अनेक मार्गावरील गाड्या विलंबाने धावतात. यामुळे प्रवाशांना बराचवेळ वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

रेल्वेस्थानकावर सुद्धा बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी दिसून येते. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या भल्यामोठय़ा रांगा लागत आहे. मात्र ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नसल्याने सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे.

अतिदूर्गम आणि पहाडाळी भागामध्ये अद्यापही एसटी पोहचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर पोहचत नसल्याने हा त्रासही सहन करावा लागतो. खासगी वाहनाने प्रवास करताना अनेकवेळा आसनसंख्येपेक्षा जास्त प्रवासी बसविल्या जाते, याकडे पोलिसांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. (नगर प्रतिनिधी)