शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बस, रेल्वे रिकाम्याच, प्रवासी घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून एस.टी.ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून एस.टी.ला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी त्याचा फटका महामंडळाला बसला आहे. आता सोमवारपासून नियमित बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासी मिळत नसल्याचे चालक तसेच वाहकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यामध्ये २४५ बसेस आहेत. लाॅकडाऊनपूर्वी त्यांतील केवळ ३० ते ४० बसफेऱ्या सुरू होत्या. आता मात्र नियमित फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विभागातील चिमूर, वरोरा, चंद्रपूर, राजुरा या आगारांतून नागपूर तसेच अन्य लांब अंतराच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. नागपूरसाठी प्रवासी मिळत असले तरी अन्य गावांतील बसेस रिकाम्याच जात आहेत.

रेल्वेलाही प्रवासी नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात बल्लारपूर रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे थांबतात. मात्र अपेक्षित प्रवासीच नाहीत. त्यामुळे रेल्वेस्थानकांवरही शुकशुकाट बघायला मिळत आहे.

बाॅक्स

एस.टी.च्या फेऱ्या - ८०

रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३,५००

धावणाऱ्या रेल्वेची संख्या - २५

बाॅक्स

चंद्रपूर-नागपूर बसला गर्दी

लाॅकडाऊननंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, बसफेऱ्याही नियमित धावत आहेत. चंद्रपुरातून नागपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चंद्रपूर-नागपूर या बसफेऱ्यांना बऱ्यापैकी प्रवासी मिळत आहे. अनेकवेळा बसमध्ये गर्दीसुद्धा होत आहे.

बाॅक्स

बऱ्यापैकी उत्पन्न

लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळतात काही प्रवासी घराबाहेर पडले आहे. त्यामुळे एस.टी.ला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. यामध्ये काही दिवसांमध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास आगारप्रमुखांना आहे.

बाॅक्स

अत्यावश्यक सेवेसाठीच प्र‌वास

कोट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील काही दिवसांपासून बाहेर जाणे टाळले. आता लाट ओसरली असल्यामुळे गावाकडे जाण्याचा विचार करीत आहोत. मात्र आताही हिंमत होत नाही.

- वसंत बल्की

चंद्रपूर

कोट

लाॅकडाऊन झाल्यापासून कुठेच गेलो नाही. आता सर्व व्यवहार सुरू झाले असून एस.टी.पण सुरू झाली आहे. त्यामुळे काही दिवसांत योग्य काळजी घेऊन बाहेरगावाला जाण्याचा बेत आहे.

कोमल पिंपळकर

चंद्रपूर

कोट

सध्या शेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे बी-बियाणे तसेच इतर साहित्य आणण्यासाठी शहरात जावे लागत आहे. कधी एस.टी.ने तर कधी ऑटो तसेच मिळेल त्या साधनाद्वारे जावे लागत आहे. आता एस.टी. नियमित सुरू झाल्यामुळे प्रवास करणे सुलभ झाले आहे.

महादेव खाडे

बल्लारपूर

कोट

दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे सर्व प्रवास बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी प्रथम आरक्षण करावे लागते. एवढे करूनही पुढील गावात सुविधा मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जाणे सध्या तरी टाळलेलेच बरे.

- प्रतीक कोडापे

चंद्रपूर