शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यात रस्त्यावरूनच पकडावी लागते बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले नाही. भाजप व काँग्रेस सरकारच्या कालखंडात मोठ्या घोषणा झाल्या पण त्या हवेत विरल्या.

ठळक मुद्दे२७ वर्षांतील आश्वासने हवेत : बसस्थानकाअभावी प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आणि तेलंगणा राज्याचा सीमावर्ती भाग लागून असलेल्या कोरपना येथे अद्याप बसस्थानकाची निर्मिती न झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुका निर्मितीला २७ वर्षे झाले. नेत्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र हवेत विरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले नाही. भाजप व काँग्रेस सरकारच्या कालखंडात मोठ्या घोषणा झाल्या पण त्या हवेत विरल्या. तालुका निर्मितीच्या २७ वर्षांनंतरही बसस्थानक नसल्याने प्रवाशांना चक्क रस्त्यावरील पानटपरी व हॉटेल समोर उभे राहून बस पकडावी लागत आहे. या तालुक्यात विकासाचा मोठा अनुशेष आहे. सामाजिक कल्याणाच्या योजना तालुक्यात पोहोचल्या नाही. कोरपना शहरात राज्य परिवहन महामंडळाकडून कमी बसेस सोडल्या जातात. त्यातच बसस्थानक नसल्याने संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने कोरपन्यात बसस्थानक उभारावे तसेच वरोरा, पांढरकवडा, उमरेड, गडचिरोली, वर्धा, अहेरी, ब्रह्मपुरी, जिवती, केरामेरी, असिफाबाद, भद्रावती, रामटेक आदी बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चंद्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावर बसफेऱ्या वाढवाघुग्घुस : चंद्र्रपूर- घुग्घुस- वणी मार्गावर कमी बसफेºया असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अजुनही सामान्य बसेसची संख्या वाढविली नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या वेळापत्रकानुसार चंद्र्रपूर-घुग्घुस मार्गावर अर्धा एक तासाने बस सोडण्याचा नियम आहे. मात्र या वेळापत्रकाचे कधीच पालन होत नाही, असा आरोप प्रवाशांनी केला. मागील आठ दहा महिन्यापूर्वी चंद्र्रपूर डेपोतून चंद्र्रपूर- घुग्घुस वणी आणि वणी डेपोतून वणी-घुग्घुस- चंद्र्रपूर जलद बसेस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरून घुग्घुस व वणी ये जा करणाºया प्रवाशांना सोय उपलब्ध झाली. पण, बहुतांश बसेस फुल्लं राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. यातून शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना सकाळी व सायंकाळी ताटकळत राहावे लागते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी चंद्र्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावर सामान्य बसेस वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.